जालना: सध्याच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी देखील फळबागांच्या शेतीतून बक्कळ कमाई करत आहेत. द्राक्ष हे निसर्गाला अतिशय संवेदनशील असं पीक आहे. अधिक खर्चिक असल्याने शक्यतो सधन शेतकरीच द्राक्ष शेतीकडे वळतात. मात्र जालना जिल्ह्यातील नंदापूर आणि कडवंची परिसर याला अपवाद ठरला आहे. नंदापूरचे शेतकरी संदीप उबाळे हे याच द्राक्ष शेतातून बक्कळ कमाई करत आहेत. लोकल18 च्या माध्यमातून त्यांनी यशाचं रहस्य सांगितलंय.



