जालना : राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असून तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली कोसळले आहे. मराठवाड्यामधील थंडीची असलेली लाट ही सामान्य आहे की असामान्य? या थंडीचा रब्बी पिकांवर कसा परिणाम होऊ शकतो? तसेच सर्वसामान्यांनी या दिवसांत काय काळजी घ्यावी? याबद्दल कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना येथील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी लोकल 18 शी बोलताना माहिती दिली.



