पुणे विद्यापिठात ज्ञानोबा ते तुकोबा या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्रात गोविंदगिरी महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हटले, संत परंपरेत दासबोधच फक्त ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत.संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.



