राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर, सांगली, परभणी आणि धाराशिवमध्ये या महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्गबाधित शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला.



