राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला दिनाच्या कार्यक्रमाला भाषण करताना म्हटले, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे. महिलांना मानव संसाधन म्हणून अर्थव्यवस्थेच्या या चक्रामध्ये भागिदारी मिळाली पाहिजे. या दृष्टीने या योजना केल्या आहेत. योजनेतून आधार देण्याचं काम करत आहोत.वेगवेगळ्या प्रयोगातून महिलांना सक्षम करायचा विचार चालला आहे. 1 कोटी माझ्या भगिनी लखपती दीदी बणणार आहेत. त्या आता अर्थव्यवस्थेच्या भाग बनणार आहेत. फक्त महिलांना सक्षम करण्याचा नाही, तर अर्थचक्र परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे.



