महायुतीची पत्रकार परिषद झाली तेव्हा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आम्हाला विरोधकांचं ६ पानांचं आणि १८ मुद्द्यांचं पत्र मिळाले आहे. शरद पवार गटाचे आमदार हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी एका माजी आमदारांचीच सही घेतली. खरंतर आज जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रात आहेत.हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवले असते, तर आदित्यजींनी त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट आहेत, तज्ञ आहेत त्यांना दाखवून चूका दुरुस्त करुन घेतलं असते."



