मंत्रिपद गप्प बसण्यासाठी नाही. जनतेच्या बाजूने बोलण्यासाठी आहे. मंत्रिपद काय चाटायचे आहे का? असा संतप्त सवाल गणेश नाईक यांनी केला. यावेळी त्यांचा रोख थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. महापालिका निवडणुकीनंतर उभय नेत्यांमधला संघर्ष संपेल, असे वाटत होते. मात्र आता त्यांच्या वादाचा दुसरा अंक पाहायला मिळत आहे.त्यांनी एकनाथ शिंदे यांना थेटपणे लक्ष्य केले. माझा राग शांत करायचा असेल, तर नवी मुंबईचे सर्व भूखंड परत करा. हे भूखंड जनतेचे आहेत, ते जनतेलाच मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.



