मुंबईचा जीवघेणा लोकल प्रवास चर्चेचा मुद्दा झाला आहे. आज रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणात तिसऱ्याच तरुणाला आपला एक डोळा गमवावा लागला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून वांद्रे लोहमार्ग पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे.



