advertisement

Iran War : इराणमधील तणावाचा भारताशी काय संबंध? याचा आपल्या भारतीयांवर कसा होणार परिणाम?

Last Updated:

इराणमधील हे संकट भारतासाठी 'लांबचं' असलं तरी त्याचे परिणाम मात्र 'अगदी जवळचे' आहेत. ते कसे? जाणून घेऊया.

india and war
india and war
मुंबई : सध्या टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मीडियावर इराण, इस्रायल, इराक आणि USA मधील युद्धाच्या बातम्यांचा पूर आला आहे. रणांगण भारतापासून साधारण 2,100 किलोमीटर दूर आहे, त्यामुळे अनेकांना वाटतं की, "आपल्याला काय फरक पडतो?" पण अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर, हे युद्ध फक्त दोन देशांमधलं नाहीये. जागतिक बाजारपेठेच्या साखळीत भारत अशा ठिकाणी आहे की, तिथे देशात कुठेही पडलेली एक ठिणगी आपल्या स्वयंपाकघरातील गॅसपासून ते खिशातील पाकिटापर्यंत सगळं काही होरपळून टाकू शकते.
इराणमधील हे संकट भारतासाठी 'लांबचं' असलं तरी त्याचे परिणाम मात्र 'अगदी जवळचे' आहेत. ते कसे? जाणून घेऊया.
1. 'होर्मुझची खाडी': भारताची गळादाब?
भारताला लागणारं एकूण कच्चं तेल आपण 90% आयात करतो. यातील निम्म्याहून अधिक तेल (सुमारे 50-55%) हे 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) या अरुंद सागरी मार्गातून येतं. इराण या मार्गावर नियंत्रण ठेवतो. युद्धाच्या तणावात जर इराणने हा मार्ग बंद केला किंवा तिथे जहाजांवर हल्ले झाले, तर भारताचा तेल पुरवठा एका रात्रीत संकटात येईल. परिणामी, पुरवठा कमी आणि मागणी जास्त झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणे अटळ आहे.
advertisement
2. इंधनाचे दर आणि '200 पार'ची भीती
कच्च्या तेलाच्या किमतीत सध्या मोठी अस्थिरता आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हे युद्ध लांबलं, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 100 ते 110 डॉलर प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतं. भारतात आधीच इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. त्यात जागतिक वाढीची भर पडली, तर पेट्रोलचे दर नवीन उच्चांक गाठू शकतात. इंधन महागलं की वाहतूक महागते आणि वाहतूक महागली की भाजीपाल्यापासून ते किराणा सामानापर्यंत सर्व काही महाग होतं.
advertisement
3. हवाई प्रवासाचा 'लांबचा' फेरा
इराण, इस्रायल आणि इराक या देशांनी आपलं हवाई क्षेत्र (Airspace) बंद केल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना आता युरोपला जाण्यासाठी मोठा फेरा मारून जावा लागत आहे. परिणामी विमानाचं इंधन जास्त लागतंय आणि प्रवासाचा वेळही वाढलाय. यामुळे विमान प्रवासाची तिकिटे महागली आहेत. जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील.
advertisement
4. शेअर बाजार आणि सोन्याची 'चमक'
युद्धाच्या बातम्या येताच शेअर बाजारात भीतीचं वातावरण निर्माण होतं. विदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतून पैसा काढून सुरक्षित ठिकाणी हलवतात, ज्यामुळे 'मार्केट क्रॅश' होण्याची भीती असते. याउलट, युद्धाच्या काळात लोक सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि सोन्याचे भाव पुन्हा एकदा गगनाला भिडू शकतात.
advertisement
5. चाबहार बंदर आणि व्यापारावर टांगती तलवार
भारताने इराणमध्ये 'चाबहार बंदर' विकसित करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. हे बंदर भारतासाठी मध्य आशियाचा दरवाजा आहे. युद्धाच्या आगीत या प्रकल्पाचं काम रखडलं, तर भारताच्या व्यापारिक रणनीतीला मोठा धक्का बसू शकतो. तसेच, भारताची निर्यात (विशेषतः बासमती तांदूळ आणि चहा) देखील विस्कळीत होऊ शकते.
advertisement
आपण सावध का असायला हवं?
जरी आपण प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलो, तरी 'ग्लोबल व्हिलेज' च्या नियमानुसार एका कोपऱ्यात झालेला गोंधळ दुसऱ्या कोपऱ्यात महागाईचा तूफान आणतो. इराणमधील हे युद्ध लवकर शांत न झाल्यास, भारतीयांना येणाऱ्या काळात महागाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागू शकतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran War : इराणमधील तणावाचा भारताशी काय संबंध? याचा आपल्या भारतीयांवर कसा होणार परिणाम?
Next Article
advertisement
How Khamenei Killed: एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत; 30 बॉम्बांचा महाप्रहारची इनसाइड स्टोरी
एका सीक्रेट मीटिंगने अयातुल्ला खामेनेईंचा घात केला, थरकाप उडवणारा अंत
  • मोसादची अचूक वेळ आणि अमेरिकेचा फास

  • गुप्त बैठकीत घुसून खामेनेईंचा खात्मा

  • अभेद्य समजल्या जाणाऱ्या संकुलाची राखरांगोळी

View All
advertisement