सगळे वाट पाहत होते पण वरात आली नाही; नवरीच्या वडिलांनी फोन केला, कारण समजताच धक्का
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding video : लग्नाची वरात लग्न मंडपापर्यंत पोहोचेपर्यंत 4 तास उशीर झाला. यामागील कारण असं की तुम्ही स्वप्नातही विचार करणार नाही. वरातीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : लग्न म्हणजे प्रत्येकासाठी खास क्षण असतो. विशेषतः मुलीसाठी. नवरदेव एखाद्या राजकुमाराप्रमाणे घोड्यावर बसून आपल्या दारात वरात घेऊन येईल, असं स्वप्न बहुतेक मुली पाहतात. वरात दारात किंवा मंडपात येईपर्यंत तिच्यासह तिच्या पालकांच्या मनात कित्येक विचारांचा गोंधळ होतो. लग्नाची वरात दारात येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नसतो. अशाच एका लग्नाची वरात जी आली नाही. वरात का आली नाही म्हणून वधूच्या वडिलांनी फोन केला. याचं कारण समजताच त्यांना धक्का बसला.
लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर होतो आहे. लग्नाची वरात 4 तास उशिरा पोहोचली. वरात उशिरा येण्याचं कारण काय हेसुद्धा या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे. यामागील कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लग्नाची वरात रस्त्यावरून जात आहे. सहसा लग्नाची मिरवणूक वाजतगाजत कार्यक्रमस्थळी म्हणजे लग्नमंडप किंवा लग्नाच्या हॉलवर जाते. मात्र या व्हिडिओमध्ये लग्नाची वरात मुलींच्या हॉस्टेलजवळ थांबलेली दिसते. वरात निघाली असता वाटेत मुलींचं वसतिगृह दिसलं. वसतिगृहाच्या गच्चीवर उभ्या असलेल्या मुली लग्नातील पाहुण्यांसोबत नाचू लागल्या. यानंतर लग्नाचे पाहुणे चार तास तिथं उभे राहिल्याने त्यांना लग्नाला जाण्यास उशीर झाला.
advertisement
advertisement
reena.pal.1656 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला.
लोकांनी वधूबद्दल सहानुभूती व्यक्त केली. लग्नातील पाहुणे अनेकदा अशा गोष्टी करतात, त्यांच्या आनंदात ते वधूपक्ष आणि त्यांना किती त्रास सहन करावा लागतो याचा विचार करत नाहीत. असं अनेकांनी लिहिलं आहे. तर काहींनी लिहिलं की, मुली लग्नापूर्वीच इतकी मजा करू शकतात. लग्नानंतर आयुष्य जबाबदाऱ्यांचं ओझ्याखाली दबतं.
Location :
Delhi
First Published :
December 18, 2024 8:43 AM IST
मराठी बातम्या/Viral/
सगळे वाट पाहत होते पण वरात आली नाही; नवरीच्या वडिलांनी फोन केला, कारण समजताच धक्का