advertisement

Mahabharat : 5-5 पती, पांडवांसाठी द्रौपदीने बनवले होते 'हे' नियम

Last Updated:

Mahabharat Story : द्रौपदीने सर्व पांडवांना समान वागणूक दिली आणि त्यांची काळजी घेतली. जेव्हा जेव्हा पांडव कोणत्याही अडचणीत किंवा संकटात असत तेव्हा ती सर्वांना समान सल्ला आणि प्रेरणा देत असे.

महाभारत स्टोरी
महाभारत स्टोरी
नवी दिल्ली : महाभारतातील प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे द्रौपदी. जिनं पाच पांडवांशी लग्न केलं होतं. द्रौपदीचे 5 पती होते. जेव्हा द्रौपदीचं लग्न पाच पांडव बंधूंशी झालं तेव्हा लग्नानंतर ती त्यांच्यासोबत कशी राहायची याचाही नियम बनवण्यात आला होता. प्रत्येक पांडव बांधवाने गोपनीयतेचा हा नियम काटेकोरपणे पाळला.
द्रौपदीने सर्व पांडवांना समान वागणूक दिली आणि त्यांची काळजी घेतली. जेव्हा जेव्हा पांडव कोणत्याही अडचणीत किंवा संकटात असत तेव्हा ती सर्वांना समान सल्ला आणि प्रेरणा देत असे. जेव्हा द्रौपदी पाचही पांडवांची पत्नी बनली, तेव्हा द्रौपदी एका वेळी फक्त एकाच पांडवासोबत राहील असा निर्णय घेण्यात आला. पाच पांडव बंधू आणि द्रौपदी यांच्यात एक नियम करण्यात आला. यानुसार, ज्या काळात पांडव द्रौपदीसोबत असतील, त्या काळात इतर पांडव तिच्या वैयक्तिक जागेत प्रवेश करणार नाहीत. जर कोणी हे अजाणतेपणे केलं तर त्याला स्व-निर्वासन (हद्दपारी) मध्ये जावं लागेल.
advertisement
प्रत्येक पांडवासोबत किती दिवस राहायची द्रौपदी?
द्रौपदीने प्रत्येक पांडव भावासोबत पत्नी म्हणून राहण्याची वेळ निश्चित केली होती. महाभारताच्या काही आवृत्त्या आणि विविध अर्थांमध्ये असं म्हटलं आहे की द्रौपदीसोबत प्रत्येक पांडवाचा वास्तव्याचा कालावधी दोन महिने आणि 12 दिवस म्हणजे 72 दिवस होता. यासोबतच, पाच पांडवांसह द्रौपदीचे 360 दिवसांचं चक्र वर्षभर पूर्ण झालं. तथापि या काळात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय आवृत्त्यांमध्ये फरक आहे. महाभारताच्या दक्षिण भारतीय आवृत्त्या आणि संबंधित कथांमध्ये असं म्हटलं आहे की द्रौपदी प्रत्येक पांडवांसोबत एक वर्ष राहिली.
advertisement
जेव्हा द्रौपदी एका पांडवांसोबत राहत होती, तेव्हा तिचं इतर पांडव भावांसोबतचे वर्तन अतिशय संतुलित, सभ्य, प्रेमळ आणि आदरयुक्त होतं. तिने इतर पांडवांवर कोणताही अधिकार गाजवला नाही किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. तिचं वर्तन इतर पांडवांशी कधीही भेदभावपूर्ण नव्हतं.
advertisement
अर्जुनने मोडला होता नियम
महाभारतात या घटनेचा उल्लेख आहे. जेव्हा द्रौपदी युधिष्ठिरसोबत होती, तेव्हा अर्जुन त्यांच्या खोलीत शिरला.  एके दिवशी अर्जुनला त्याचं धनुष्यबाण हवं होतं, जे युधिष्ठिरच्या खोलीत ठेवलं होतं. तेव्हा युधिष्ठिर आणि द्रौपदी त्यांच्या खाजगी खोलीत एकटेच होते. अर्जुनला माहित होतं की नियमांनुसार त्याने खोलीक प्रवेश करू नये, परंतु परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्याने नियम तोडले आणि तो खोलीत गेला. अर्जुनने द्रौपदी आणि युधिष्ठिराचा एकांत भंग केला.
advertisement
अर्जुनने मान्य केलं की त्याने नियम मोडला जरी त्याचा हेतू वाईट नव्हता, तो चांगलाच होता. पण नियमांनुसार, त्याला 12 वर्षे वनवास भोगावा लागला. हा निर्णय अर्जुनने स्वतः घेतला, कारण पांडवांमध्ये परस्पर प्रतिष्ठा आणि धर्माचं पालन हे अत्यंत महत्त्वाचे होतं.
advertisement
अर्जुन स्वतः वनवासात गेला. युधिष्ठिराने अर्जुनाच्या वनवासाच्या निर्णयाचा आदर केला. या वनवासात अर्जुन 12 वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी राहिला. या काळात त्याने उलुपी (नागकन्या), चित्रांगदा आणि सुभद्रा यांच्याशीही लग्न केलं. दैवी शस्त्रांचा सराव केला. त्याने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केलं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Mahabharat : 5-5 पती, पांडवांसाठी द्रौपदीने बनवले होते 'हे' नियम
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement