लग्न, दोन मुलं आणि नंतर धक्कादायक सत्य; पतीबद्दल असं काही समजलं की बायको हादरली
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इथे राहणाऱ्या आरती चौहान या महिलेने आपल्या पतीवर आणि त्याच्या काही साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : आजच्या काळात नाती आणि विश्वास हे सगळं काहीसं बदललेलं दिसतंय. काही लोक आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतात, तर काहीजण नात्याचं नाटक करतात. अशाच एका धक्कादायक प्रकरणानं खळबळ उडवली आहे. यामध्ये लग्नाच्या अनेक वर्षानंतर बायकोसमोर नवऱ्याचं असं सत्य समोर आलं ज्यामुळे ही पूर्ती हादरली.
इथे राहणाऱ्या आरती चौहान या महिलेने आपल्या पतीवर आणि त्याच्या काही साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत. आरतीचं लग्न 2020 साली सनी नावाच्या एका तरुणाशी झालं. लग्नाच्या वेळी सनीने स्वतःला हिंदू क्षत्रिय असल्याचं सांगितलं आणि अयोध्येतील देवकाली मंदिरात हिंदू पद्धतीने विवाह केला.
विवाहानंतर त्यांना दोन मुलं झाली. सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आरतीला कळलं की सनीचं खरं नाव खुर्शीद आलम असून तो मुस्लिम आहे. हे सत्य समजताच ती हादरली. यानंतर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला गेला. गणपती बसवण्यावरून वाद झाले आणि तिला धमक्या दिल्या गेल्या.
advertisement
तिच्या म्हणण्यानुसार, पतीने तिला बेशुद्ध करणारी औषधं दिली आणि तिच्याशी अश्लील वर्तन केलं. इतकंच नाही, तर त्याच्या मित्रांना तिच्याशी गैरवर्तन करण्यासाठी जबरदस्तीने आणलं. या सगळ्या प्रकरणात शेजारी सफीक, त्याची पत्नी सिमरन आणि आणखी 15 जण सामील होते, असं आरतीचं म्हणणं आहे.
तिने लखनऊच्या ओलू नावाच्या गुन्हेगारावरही धमक्या दिल्याचा आरोप केला आहे, तो सिमरनचा भाऊ आहे. आज आरती आणि तिची दोन मुलं भीतीमध्ये आयुष्य जगत आहेत. पोलिसांकडे अनेकदा मदतीसाठी विनवण्या केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
advertisement
आरतीने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की “जर मला वेळेत न्याय मिळाला नाही, तर मी माझ्या दोन मुलांसह मुख्यमंत्री जनतेच्या दरबारात आत्महत्या करीन.” हे प्रकरण आता केवळ अयोध्येपुरतंच मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चेचा विषय बनलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 19, 2025 3:16 PM IST