कृषी हवामान : शेतकऱ्यांनो! पावसाचं संकट कायम, 26 जिल्ह्यांना अलर्ट, पिकांसाठी कृषी सल्ला काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : मॉन्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई : मॉन्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
पावसाची स्थिती व हवामान बदल
मराठवाडा आणि त्याच्या परिसरात समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दक्षिण कर्नाटकपासून कोमोरीन भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेशापासून आंध्र प्रदेशापर्यंत कमी दाबाची रेषा निर्माण झाल्याने पावसाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे.
advertisement
बुधवारी (ता.17) वर्धा येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले असून, पावसाच्या पार्श्वभूमीवर तापमानात घट झाली असली तरी काही ठिकाणी अद्याप उष्णतेची तीव्रता जाणवते.
मॉन्सूनचा परतीचा प्रवास
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) 14 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीला सुरुवात केली. त्यानंतर 16 सप्टेंबरला राजस्थानच्या आणखी काही भागांतून तसेच गुजरात, पंजाब आणि हरियानामधून मॉन्सून माघारी गेला. परंतु महाराष्ट्रात अद्याप जोरदार पावसाची परिस्थिती कायम आहे. 17 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
जोरदार पावसाचा इशारा : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.
वादळी पावसाचा इशारा (विजांसह) : नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
advertisement
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला
जोरदार पावसामुळे शेतीतील पिकांचे संरक्षण करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. हवामानातील आर्द्रता व वादळी पावसामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
सोयाबीन पिकासाठी
पाने पिवळसर होऊ नयेत म्हणून कार्बेन्डाझिम + मॅन्कोजेब मिश्रणाची फवारणी करावी. शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रिड किंवा थायामेथोक्झाम फवारणी करून पाने खाणाऱ्या अळीवर नियंत्रण ठेवावे.
advertisement
कापूस पिकासाठी
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्पिनोसेड किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल यांची फवारणी करावी. पांढरी माशी व मावा नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड फवारणी उपयुक्त ठरते.
तांदूळ पिकासाठी
तुडतुडे आणि पानांवर डाग पडण्याची शक्यता असल्याने क्विनॉलफॉस किंवा फिप्रोनिल फवारणी करावी. पानांवर डाग पडू नयेत म्हणून कार्बेन्डाझिम फवारणी करावी.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 8:05 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांनो! पावसाचं संकट कायम, 26 जिल्ह्यांना अलर्ट, पिकांसाठी कृषी सल्ला काय?