advertisement

Marathwada Rain: दुष्काळी मराठवाड्यात का होतेय अतिवृष्टी? शेतीचे नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सूचवले उपाय, Video

Last Updated:

Marathwada Rain: गेल्य काही काळात दुष्काळी मराठवाड्यात अतिवृष्टी होत आहे. तसेच हवामानाच्या चक्रात देखील मोठे बदल जाणवत आहेत. याबाबत कृषी तज्ज्ञांनी माहिती दिलीये.

+
Marathwada

Marathwada Rain: दुष्काळी मराठवाड्यात का होतेय अतिवृष्टी? शेतीचे नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सूचवले उपाय, Video

जालना: मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष करून मराठवाड्यासारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागांमध्येही अतिवृष्टी होत आहे. साधारणपणे सप्टेंबरमध्ये पावसाळा संपत असतो. परंतु, मागील काही वर्षात पावसाळा 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत लांबत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. या सर्व परिस्थितीला कोणकोणते घटक कारणीभूत आहेत? आणि या वातावरणीय बदलांशी आपण कशा पद्धतीने जुळवून घेऊ शकतो? याबाबत जालना येथील कृषी अभियंते पंडित वासरे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
2019 पासून वातावरणीय बदलांचा परिणाम आपल्याला प्रकर्षाने जाणवायला सुरुवात झाली आहे. पाऊस आला तर खूप लवकर येतो, कमी कालावधीत खूप जास्त पाऊस पडतो किंवा दोन पावसामधील खंड देखील वाढल्याचे पाहायला मिळते. यासाठी विविध घटक कारणीभूत आहेत. यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे झालेले जमिनीचे तुकडीकरणही कारणीभूत आहे. लोकसंख्या वाढली तसतसे जमिनीची तुकडे वाढले. यामुळे बांधबंधिस्ती कमी झाली. अतिरिक्त पाऊस आणि पाणी वाहून जाण्यास जागा शिल्लक न राहिल्याने शेती पिकांचे नुकसान होत आहे, असे वासरे सांगतात.
advertisement
प्रत्येक महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे ठरलेले आहे. जालना जिल्ह्यात जून महिन्यामध्ये 175, जुलैमध्ये 175, ऑगस्टमध्ये 140 ते 160 तर सप्टेंबर मध्ये 140 ते 150 तर ऑक्टोबर मध्ये 40 मिलीमीटर एवढा पाऊस होतो. सरासरी पर्जन्यमान हे 700 मिलिमीटरच्या आसपास आहे. परंतु, 2025 मध्ये केवळ सप्टेंबर महिन्यातच 400 मिलिमीटर एवढा पाऊस झालाय. वार्षिक सरासरीच्या 65 टक्के पाऊस हा केवळ एकाच महिन्यात झालाय. हे सर्व वातावरणीय बदलाचा परिणाम असल्याचे ते सांगतात.
advertisement
या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी कमी, मध्यम आणि जास्त पाण्याला सक्षम असे पिकांचे वाण विकसित करावे लागतील. खरिपापूर्वी दुष्काळ, सरासरी पाऊस आणि अतिरिक्त पाऊस यासंबंधी नियोजन करावं लागेल, असं कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कृषी अभियंता पंडित वासरे यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Marathwada Rain: दुष्काळी मराठवाड्यात का होतेय अतिवृष्टी? शेतीचे नुकसान टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी सूचवले उपाय, Video
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement