advertisement

शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महिंद्रा अन् स्वराज कंपनीने ट्रॅक्टरबाबत अखेर 'तो' निर्णय घेतलाच!

Last Updated:

Tractor News : देशातील कृषी यंत्र साहित्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे.

Tractor News
Tractor News
मुंबई : देशातील कृषी यंत्र साहित्याच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. ट्रॅक्टरसारखी अत्यावश्यक यंत्रसामग्री महाग होणार असून आघाडीच्या कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे. महिंद्रा अँड महिंद्राआणि स्वराज ट्रॅक्टर यांनी एप्रिल २०२६ पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन दर कधी लागू होणार?
महिंद्रा कंपनी ८ एप्रिल २०२६ पासून ट्रॅक्टरच्या किमती वाढवणार आहे. तर महिंद्रा समूहातीलच स्वराज ट्रॅक्टर्स २१ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू करणार आहे. याशिवाय कुबोटा कंपनीनेही दरवाढ जाहीर केली असून १५ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू होतील. मात्र ही वाढ कुबोटा ब्रँडच्या ट्रॅक्टर्सना लागू होणार नाही.
advertisement
किंमती वाढण्यामागील कारणे
ट्रॅक्टरच्या किमती वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ. स्टील, रबर आणि इतर कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला असून, तो भरून काढण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरत आहे.
ऑटो क्षेत्रातील वाढता ट्रेंड
ही दरवाढ केवळ ट्रॅक्टर उद्योगापुरती मर्यादित नाही. संपूर्ण ऑटोमोबाईल आणि शेती उपकरण क्षेत्रात किमती वाढण्याचा ट्रेंड दिसत आहे. वाढत्या खर्चामुळे अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत, त्यामुळे भविष्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
स्वराज ट्रॅक्टर्सचा प्रवास
स्वराज ट्रॅक्टर्स हा देशातील विश्वासार्ह ब्रँडपैकी एक मानला जातो. 2007 मध्ये महिंद्रा समूहाने पंजाब ट्रॅक्टर्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक करून हा ब्रँड आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर स्वराजने भारतीय बाजारपेठेत मजबूत स्थान निर्माण केले आहे.
शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?
ट्रॅक्टरच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. आधीच बियाणे, खते, डिझेल आणि मजुरीचा खर्च वाढलेला असताना आता यंत्रसामग्रीही महाग होणार आहे. त्यामुळे नवीन ट्रॅक्टर खरेदी करणे अनेक शेतकऱ्यांसाठी कठीण होऊ शकते.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या मालाच्या किमती वाढत राहिल्यास येत्या काळात आणखी कंपन्या दरवाढ करू शकतात, ज्यामुळे कृषी क्षेत्रावर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महिंद्रा अन् स्वराज कंपनीने ट्रॅक्टरबाबत अखेर 'तो' निर्णय घेतलाच!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement