advertisement

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! नाशिक कृषी बाजार समिती ‘या’ वेळेत राहणार बंद

Last Updated:

Nashik Bazar Samiti: नाशिक बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! नाशिक कृषी बाजार समिती ‘या’ वेळेत राहणार बंद
शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! नाशिक कृषी बाजार समिती ‘या’ वेळेत राहणार बंद
नाशिक: नाशिक बाजार समितीत शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात. मात्र आता बाजार समिती रात्रारी 11 ते पहाटे 4 यावेळेत बंद राहणार आहे. 11 वाजलेनंतर काही गुंड प्रवृत्तीचे टोळके मद्यपान करून बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला विनाकारण त्रास देतात. तसेच पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
बाजार समितीच्या भाजीपाला बाजारात मद्यपींचा त्रास वाढला आहे. कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाजार समितीने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोंरं जावं लागू नये म्हणून रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. याबाबत बाजार समिती आवारात तसे फलकही लावण्यात आले आहेत.
advertisement
सुरक्षेत वाढ
नाशिक बाजार समितीत वाढत्या चोऱ्या आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. रात्रीचे शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार थांबवण्यासाठी रात्री 11 ते 4 या वेळेत बाजार समिती बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेची देखील अधिक खबरदारी घेतली जाणार आहे.
advertisement
दरम्यान, तब्बल 5 दिवसांच्या सुट्टीनंतर लासलगाव बाजारसमितीत आजपासून कांदा लिलाव सुरू झाला आहे. मात्र कांदा दरात घसरण झाली असून यामुळे आज कांद्याला कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1602 तर सरासरी 1250 रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! नाशिक कृषी बाजार समिती ‘या’ वेळेत राहणार बंद
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement