कृषी हवामान : रविवारचा दिवसही मुसळधार पावसाचा! 13 जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर, खरीप पिकांना मोठा धोका

Last Updated:

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे. ही हवामान प्रणाली सध्या दक्षिण छत्तीसगड आणि त्याच्या परिसरावर सक्रिय असून, समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत.

maharashtra weather update
maharashtra weather update
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे. ही हवामान प्रणाली सध्या दक्षिण छत्तीसगड आणि त्याच्या परिसरावर सक्रिय असून, समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत उद्यापर्यंत (18 ऑगस्ट) गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याची चिन्हे आहेत.
शनिवारी (ता.16) सकाळपर्यंत कोकण व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे राज्यातील उच्चांकी 231 मिमी तर चिपळूण येथे 223 मिमी पाऊस झाला. भंडारा येथे तापमान 34 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. अनेक ठिकाणी 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने आज (ता.17) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकण, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्ह्यांत तसेच उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
मुसळधार पावसामुळे खरीप व बारमाही पिकांना मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे
खरीप पिके (सोयाबिन, तूर, मका, भात इ.)
पिकात पाणी साचू नये यासाठी शेतात पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
भातशेतीत अतिरिक्त पाणी काढून टाकून पाणीपातळी संतुलित ठेवावी. पावसामुळे पिकात रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने वेळोवेळी तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी.
advertisement
बारमाही पिके (ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष इ.)
झाडांच्या बुंध्याजवळ पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी. वाऱ्याचा जोर असल्यास केळी व द्राक्षाच्या वेलींसाठी आधार व्यवस्था मजबूत करावी. पावसानंतर कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (बुरशीनाशक फवारणी) करावी.
जनावरांची काळजी
पावसाळ्यात चाऱ्याचे योग्य साठवण करावे. गोठ्यांत स्वच्छता व कोरडेपणा राखावा, जेणेकरून जनावरांच्या पायांना संसर्गजन्य आजार होणार नाहीत.
advertisement
एकूणच, राज्यात मुसळधार पावसामुळे खरीप आणि बारमाही पिकांना आव्हाने निर्माण झाली असली तरी योग्य वेळी उपाययोजना करून नुकसान टाळता येऊ शकते. हवामान विभागाच्या अलर्टनुसार दक्षता घेणे हेच सध्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : रविवारचा दिवसही मुसळधार पावसाचा! 13 जिल्ह्यांना हाय अलर्ट जाहीर, खरीप पिकांना मोठा धोका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement