TRENDING:

कृषी हवामान : पावसाचं मोठं संकट! धुमाकूळ घालणार, २५ जिल्ह्यांना अलर्ट, शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?

Last Updated:

Maharashtra Weather Update :  राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जना, विजा आणि वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Weather News
Maharashtra Weather News
advertisement

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मेघगर्जना, विजा आणि वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट दिला आहे. आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उर्वरित भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे.

advertisement

राज्यातील हवामानस्थिती

शनिवारी (ता. 20) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. खोपोली (घाटमाथा), पंढरपूर आणि जालना येथे तब्बल 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी राज्यातील सर्वाधिक ठरली. मात्र, विदर्भात पावसाचा जोर तुलनेने कमी दिसून आला. तरीही वर्धा येथे कमाल तापमान 35.4 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे राज्यातील उच्चांकी ठरले. अनेक भागांत अद्याप कमाल तापमान तिशीपार असल्याने उन्हाचा चटका कायम आहे.

advertisement

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

हवामान विभागाने सांगितले की, आज (ता. 21) संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

advertisement

मॉन्सूनच्या परतीस पोषक हवामान

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 14 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतू लागले आहेत. 20 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाटचालीत फारसा बदल झाला नाही. सध्या भटिंडा, फतेहाबाद, पिलानी, अजमेर, दिसा आणि भूज या भागांपर्यंत परतीची रेषा स्थिर आहे. परंतु हवामान पोषक असल्याने पुढील दोन दिवसांत गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागांतून मॉन्सूनची माघार घेण्याची शक्यता आहे.

advertisement

पिकांना काय फवारणी करावी?

सोयाबीन

पानांवर डाग / कडव्याचा रोग मॅन्कोझेब 75% WP (2.5 ग्रॅम/लिटर पाणी) किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड.

अळीचा प्रादुर्भाव एमॅमेक्टिन बेन्झोएट 5% SG (0.4 ग्रॅम/लिटर पाणी).

कापूस

पिंक बॉलवर्म/अळी स्पिनोसॅड 45% SC (0.3 मिली/लिटर पाणी) किंवा फ्लूबेन्डायामाईड 20% WG (0.2 ग्रॅम/लिटर पाणी).

पाने गळ रोग / डाग कार्बेन्डाझीम 50% WP (1 ग्रॅम/लिटर पाणी) + मॅन्कोझेब 75% WP (2 ग्रॅम/लिटर पाणी) मिश्र फवारणी.

भात (धान)

किडे किडेगंज (स्टेम बोरर) क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% SC (0.3 मिली/लिटर पाणी).

तांबेरा रोग / करपा ट्रायसायक्लाझोल 75% WP (0.6 ग्रॅम/लिटर पाणी).

मका

अळीचा प्रादुर्भाव एमॅमेक्टिन बेन्झोएट 5% SG (0.4 ग्रॅम/लिटर पाणी).

पानांवरील डाग रोग मॅन्कोझेब 75% WP (2.5 ग्रॅम/लिटर पाणी).

डाळी (उडीद, मूग, हरभरा इ.)

शेंगा पोखरणारी अळी इंडॉक्साकार्ब 14.5% SC (1 मिली/लिटर पाणी).

डाग रोग क्लोरोथॅलोनिल 75% WP (2 ग्रॅम/लिटर पाणी).

मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : पावसाचं मोठं संकट! धुमाकूळ घालणार, २५ जिल्ह्यांना अलर्ट, शेतकऱ्यांसाठी सल्ला काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल