याशिवाय, जुलै आणि ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीबाबतही १,३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली आहे.
सप्टेंबरमधील पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणारी मदत
सातारा जिल्हा: ६.२९ कोटी रु
advertisement
धाराशिव: ३.१८ कोटी रु
बीड: २९२.४९ कोटी रु
लातूर: २४५.६४ कोटी रु
परभणी: ५७७.७८ कोटी रु
नांदेड: ३११.२९ कोटी रु
कोल्हापूर: २०२.३८ कोटी रु
या जिल्ह्यांमध्ये १५ लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरकारने या सर्वांना थेट खात्यात मदत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै-ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी विभागनिहाय मदत
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील ७,८८,९७४ शेतकऱ्यांना ६,५४,५९५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ५६५ कोटी ६० लाख ३० हजार रु
नागपूर विभाग: गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील ३७,६३१ शेतकऱ्यांना, २१,२२४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २३ कोटी ८५ लाख २६ हजार रु
पुणे विभाग: कोल्हापूर जिल्ह्यातील ३६,५५९ शेतकऱ्यांना ८,८३५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४ कोटी २८ लाख ५२ हजार रु
छत्रपती संभाजीनगर विभाग: हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांना ८ लाख ४८ हजार ४४५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ७२१ कोटी २७ लाख ८६ हजार रु
नाशिक विभाग: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांतील २४,६७७ शेतकऱ्यांना १२,१४९ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी ७७ लाख ३१ हजार रु
थेट जिल्हास्तरावरून मदत वितरण
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत आता थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे मदत त्वरित आणि कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल.