TRENDING:

पारंपरिक पिकांचा नाद सोडला! शेतात फक्त १५० झाडांची लागवड केली, परदेशात प्रचंड मागणी, शेतकरी करतोय बक्कळ कमाई

Last Updated:

Success Story : जिद्द, मेहनत आणि नवकल्पनांची जोड मिळाली, तर शेतीही सोनं पिकवू शकते, हे अनेकदा सांगितलं जातं; पण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जिद्द, मेहनत आणि नवकल्पनांची जोड मिळाली, तर शेतीही सोनं पिकवू शकते, हे अनेकदा सांगितलं जातं; पण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याने ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. धोड विधानसभा मतदारसंघातील सारवाडी गावात राहणारे शेतकरी भंवरलाल यांनी अपयश, तोटा आणि बाजारपेठेतील फसवणूक यांना न जुमानता शेतीतून यशाची नवी वाट निर्माण केली. कधी आवळा विकायलाही कोणी तयार नव्हतं, आज त्याच आवळ्यापासून लाखोंचं उत्पन्न मिळत आहे. भंवरलाल यांची ही संघर्षातून उभारी घेणारी कहाणी आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
success story
success story
advertisement

१२५ झाडांची लागवड

भंवरलाल यांनी सांगितले की, सुमारे २० वर्षांपूर्वी सीकर येथील फलोत्पादन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुसबेरी अर्थात आवळ्याची शेती सुरू केली. प्रति हेक्टर १२५ झाडांची लागवड करत त्यांनी मोठ्या अपेक्षेने हा प्रयोग केला. तीन वर्षांत झाडे फुलू लागली आणि उत्पादनही चांगले मिळू लागले, मात्र खरी अडचण तेव्हा सुरू झाली, जेव्हा बाजारपेठ मिळाली नाही.

advertisement

आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा म्हणून भंवरलाल यांना सीकर, नागौर, कुचामनसह आसपासच्या अनेक गावांमध्ये भटकंती करावी लागली. अनेकदा संपूर्ण दिवस बाजारात जाऊनही आवळा विकला जात नसे. व्यापारी प्रति किलो १० रुपयांपेक्षा जास्त दर देण्यास तयार नव्हते. काही वेळा तर केवळ ५ रुपये किलो दराने आवळा विकावा लागल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र या परिस्थितीपुढे हार न मानता भंवरलाल यांनी वेगळा मार्ग निवडला.

advertisement

स्वत:चे उत्पादन सुरू केले

“कच्चा माल विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून उत्पादने तयार करायला हवीत,” हा विचार त्यांनी प्रत्यक्षात उतरवला. कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेत त्यांनी आवळ्यापासून कँडी, जाम, लोणचे आणि आवळा पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला लहान प्रमाणात उत्पादन सुरू केले, पण गुणवत्तेमुळे त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी मिळू लागली. आज भंवरलाल केवळ स्वतःच्या शेतातील आवळाच नव्हे, तर शेजारील शेतकऱ्यांकडूनही बाजारभावापेक्षा ५ रुपये अधिक दर देऊन आवळा खरेदी करतात, त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होतो.

advertisement

देशाबाहेर निर्यात

भंवरलाल हे सीकर जिल्ह्यात स्वतंत्रपणे विविध आवळा उत्पादने तयार करणारे पहिले शेतकरी ठरले आहेत. त्यांची उत्पादने आज सीकर, नागौर, बिकानेर, झुंझुनू, चुरू, कुचामनसह अनेक शहरांमध्ये विकली जातात. एवढेच नव्हे, तर काही उत्पादने देशाबाहेरही निर्यात केली जात असून मोठ्या मॉलमध्येही त्यांना स्थान मिळाले आहे.

१३ लाखांची कमाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

भंवरलाल सांगतात की, जो आवळा पूर्वी १० रुपये किलो दराने विकला जात होता, तोच आवळा प्रक्रिया करून आज १५० रुपये किलोपर्यंत भाव देतो. पूर्वी वर्षाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते, तेच उत्पन्न आता सुमारे १३ लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या या यशात पत्नी आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा असून बाहेरील मजुरांनाही रोजगार मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक पिकांचा नाद सोडला! शेतात फक्त १५० झाडांची लागवड केली, परदेशात प्रचंड मागणी, शेतकरी करतोय बक्कळ कमाई
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल