TRENDING:

दिवाळी संपताच ४ पिकांची लागवड करा, फक्त ६० दिवसांत कराल बक्कळ कमाई

Last Updated:

Agriculture News : हिवाळा जवळ येत असताना शेतकरी वर्ग नव्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. या काळात घेतली जाणारी पिके “रब्बी पिके” म्हणून ओळखली जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा जवळ येत असताना शेतकरी वर्ग नव्या हंगामासाठी तयारीला लागला आहे. या काळात घेतली जाणारी पिके “रब्बी पिके” म्हणून ओळखली जातात. ही पिके थंड वातावरणात चांगली वाढतात आणि योग्य नियोजन व काळजी घेतल्यास कमी खर्चात अधिक उत्पन्न देतात. अनेक पिके लवकर तयार होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना अल्पावधीत चांगला नफा मिळू शकतो.
agriculture news
agriculture news
advertisement

टोमॅटो

हिवाळ्यात टोमॅटोची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. हे पीक ७० ते ८० दिवसांत तयार होते आणि बाजारात वर्षभर त्याची मागणी कायम असते. टोमॅटोला थंड वातावरणात चांगली वाढ मिळते तसेच योग्य सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर आणि रोग नियंत्रण केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. वेळेवर बाजारात पीक विकल्यास दरही समाधानकारक मिळतात.

मुळा

मुळा हे हिवाळ्यात जलद वाढणारे आणि कमी कालावधीत तयार होणारे पीक आहे. ५० ते ६० दिवसांत पीक विक्रीसाठी तयार होते. त्याचप्रमाणे मुळा देखील जलद वाढणाऱ्या पिकांपैकी एक असून, फक्त ४५ दिवसांत काढणी करता येते. या दोन्ही पिकांसाठी मोकळे व सुपीक मातीचे क्षेत्र योग्य मानले जाते.

advertisement

मसालेदार पिके

हिवाळ्यात धणे, लसूण, आले, कांदा आणि हिरवी मिरची या पिकांची लागवडही फायदेशीर ठरते. धणे व लसूण हे मसालेदार पिके बाजारात नेहमीच मागणीमध्ये असतात. योग्य सिंचन आणि खत व्यवस्थापन केल्यास ही पिके उत्कृष्ट उत्पादन देतात. कांदा आणि मिरचीचे दर वर्षभर चढ-उतार होत असल्याने हिवाळी हंगामात घेतलेले उत्पादन शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देऊ शकते.

advertisement

पालेभाज्या

कोशिंबिरीसाठी लागणारी पालेभाजी, जसे की पालक, मेथी, कोथिंबीर, लेट्यूस इत्यादी पिके हिवाळ्यात उत्तम वाढतात. ही पिके २५ ते ३० दिवसांत तयार होतात आणि थेट स्थानिक बाजारपेठेत विकता येतात. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जलद परतावा मिळतो.

यशस्वी लागवडीसाठी काही महत्त्वाचे सल्ले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

हिवाळ्यात पिकांची लागवड करताना योग्य वेळेचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमीन सुपीक, भुसभुशीत आणि निचरा योग्य असावी. बियाण्यांची निवड प्रमाणित कंपनीकडून करावी. पिकांच्या वाढीच्या काळात नियमित सिंचन, तण नियंत्रण, कीड-रोग नियंत्रण आणि योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
दिवाळी संपताच ४ पिकांची लागवड करा, फक्त ६० दिवसांत कराल बक्कळ कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल