TRENDING:

Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, 30 गुंठ्यात केली अंजिर लागवड, 3 लाख उत्पन्न

Last Updated:

तरुण शेतकऱ्याने अंजिर शेती यशस्वी केली असून या माध्यमातून त्यांना केवळ 30 गुंठ्यात 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : शेतकऱ्यांसाठी शेती म्हणजे जणू काही प्रयोगशाळाच. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग शेतकरी उत्पादन वाढीसाठी आपल्या शेतात करत असतात. जालना जिल्ह्यातील कंडारी येथील एका तरुण शेतकऱ्याने अंजिर शेती यशस्वी केली असून या माध्यमातून त्यांना केवळ 30 गुंठ्यात 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
advertisement

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावाजवळील लक्ष्मीनगर तांड्यात राहणारे स्वप्नील राठोड पारंपरिक शेती करायचे. परंतु, नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव अन् विविध संकटे यामुळे ते अंजिर शेतीकडे वळले. खुलताबाद येथून जम्बो जातीचे 200 अंजीर रोपे त्यांनी 2021 मध्ये मागवली. या रोपांची 14 बाय 15 अंतरावर लागवड केली. अवघ्या 18 महिन्यात त्यांना उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला कमी उत्पादन मिळायचे. परंतु, आता झाडे मोठी झालीत त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झाली आहे.

advertisement

शेतकाऱ्यांनो करडईची अश्या पद्धतीने करा लागवड होईल दुप्पट कमाई! महत्वाच्या टिप्सचा Video

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातलं ‘राष्ट्रगीताच गाव’, दररोज होतो इथं जागर, तुम्हाला माहितीये का?
सर्व पहा

30 गुंठे शेतात त्यांना 3 टन उत्पादन मिळते. बाजारात 100 रुपये किलो असा दर मिळतो. याचे 3 लाख रुपये होतात. या पिकाला फारसा खर्च करावा लागत नाही. घरी असलेल्या जनावरांचे शेणखत, पाणी आणि काही प्रमाणात फवारणी केली की हे पीक चांगले येते. शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले तर चांगली कमाई होऊ शकते, असं स्वप्नील कोठेच यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : पारंपरिक शेतीला दिला फाटा, 30 गुंठ्यात केली अंजिर लागवड, 3 लाख उत्पन्न
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल