TRENDING:

Agrcultre News : रब्बी पिकांची वाढ होईल चांगली, कोणत्या कराव्या उपाययोजना? संपूर्ण माहितीचा Video

Last Updated:

हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच रब्बी पिकांची लागवड ग्रामीण भागात जोर धरते. गहू, हरभरा, ज्वारी, मटार, मोहरी अशा पिकांचे उत्पादन या हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, तापमानातील अचानक घट, दवबिंदूंची वाढ आणि थंडीच्या लाटेमुळे अनेकदा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य नियोजन आणि वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement

कृषी विभागाच्या माहितीनुसार, थंडीच्या काळात वेळेवर पेरणी करणे आणि शीतसहिष्णू वाणांची निवड करणे हे पिकांच्या संरक्षणाचे पहिले पाऊल ठरते. गव्हासाठी लोकवन, हरभऱ्यासाठी जेजी 11 आणि मोहरीसाठी पीकेव्ही गोल्ड अशा वाणांचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो. थंडीमुळे जमिनीचे तापमान कमी झाल्यास पिकांची वाढ मंदावते, त्यामुळे पिकांच्या वाढीच्या टप्प्यानुसार योग्य सिंचन करणे आवश्यक आहे.

advertisement

Tur Crops Farming : ना रासायनिक खत, ना फवारणी तरीही बहरलं तूर पीक, एकरी 10 क्विंटल होणार उत्पादन, शेतकऱ्यानं असं काय केलं?

थंडीच्या रात्रींमध्ये शेतात हलके सिंचन केल्यास जमिनीचे तापमान संतुलित राहते आणि दवाचा परिणाम कमी होतो. काही भागात शेतकऱ्यांकडून मल्चिंग पद्धतीचा अवलंब केला जातो, ज्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहतो आणि मुळांचे संरक्षण होते. हरभरा, गहू, मटार यांसारख्या पिकांमध्ये थंडीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी योग्य बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे, असा सल्ला कृषी अधिकारी देतात.

advertisement

हवामानातील अचानक बदलांचा पिकांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान केंद्र आणि कृषी विभागाकडून दिले जाणारे अद्ययावत मार्गदर्शन वेळोवेळी घ्यावे. तसेच शेताच्या सभोवताल वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झाडांची लागवड केल्यास पिकांवरील थंडीचा प्रभाव कमी होतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला बुक कॅफे, काय आहे खास?
सर्व पहा

थंडीच्या तीव्र काळात रात्री शेतात धूर निर्माण करून तापमान वाढवण्याची पारंपरिक पद्धत आजही उपयुक्त ठरते. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या सर्व उपाययोजनांचा योग्य अवलंब केल्यास रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान टाळता येते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करता येते. थंडीतील शास्त्रीय उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने ‘सोनेरी पीक’ लाभते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Agrcultre News : रब्बी पिकांची वाढ होईल चांगली, कोणत्या कराव्या उपाययोजना? संपूर्ण माहितीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल