त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही भगवान शिवाची पूजा करावी, शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करावीत. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेव भगवान शंकराचे मोठे भक्त आहेत. कार्तिक पौर्णिमेला शंकराची पूजा केल्यानं शनिचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. शंकराची पूजा केल्यानं राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास देखील मदत होते. त्रिपुरारी पौर्णिमेला 108 वेळा "ओम नमः शिवाय" जप केल्यानं तुमच्या अनेक अडचणी कमी होऊ शकतात.
advertisement
ज्योतिषशास्त्रानुसार, काही उपायांनी आपण शनिदेवाला प्रसन्न केले तर राहू आणि केतू देखील त्यांचे नकारात्मक प्रभाव थांबवतात. म्हणून, कार्तिक पौर्णिमेला, तुम्ही शनिदेवासाठी छाया दान करावी. या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून ते शनि मंदिरात अर्पण करावं. असं केल्यानं साडेसाती आणि अडीचकीचे नकारात्मक प्रभाव दूर होतील असे नाही तर राहू आणि केतू शुभ फळ देण्यापासून देखील दूर होतील.
नोव्हेंबरचा पहिला आठवडा कोणासाठी लकी? मेष ते मीन 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ
कार्तिक पौर्णिमेला हनुमान चालीसाचे पठण केल्यानं देखील फायदा होतो. शनिदेव नेहमीच लाडक्या भाविकांवर आशीर्वाद वर्षाव करतात, तुम्ही या दिवशी हनुमानाची पूजा केली, भक्तीनं हनुमान चालीसाचे पठण केलं तर तुम्हाला शुभ फळे मिळतील. राहूची महादशा त्रास देत असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी मांजरीला दूध, भाकरी इत्यादी खाऊ घाला. असं केल्यानं राहूचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होईल.
त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांपासून वाचण्यास मदत होते. पौर्णिमेच्या संध्याकाळी, तुम्ही मंदिर, तलाव किंवा नदीत दिवे लावू शकता. या दिवशी कावळ्यांना भाकरी खाऊ घालणे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे राहू, केतू आणि शनिच्या क्रोधापासून दिलासा मिळतो.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
