पितृपक्षात नवमी श्राद्धाचे महत्त्व -
पितृपक्षातील नवमी दिवशी श्राद्ध केल्याने मातृऋण फेडले जाते आणि पूर्वज महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या महिला आणि अविवाहित व्यक्तींचे श्राद्ध कोणीही करत नाही, त्यांच्या आत्म्यांना या श्राद्धाद्वारे शांती मिळते. नवमी श्राद्ध केल्यानं घरात सुख-शांती येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
नवमी श्राद्धाची पूजा आणि विधी -
advertisement
नवमी श्राद्ध विधी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. श्राद्ध नेहमी दिवसा करावे. श्राद्ध करण्यासाठी घर किंवा पवित्र नदीचा किनारा निवडू शकता. श्राद्धासाठी आवश्यक साहित्य गोळा करा. यामध्ये काळे तीळ, जवस, तांदूळ, पाणी, पितृपक्षीय भोजन (पुरणपोळी, खीर, आणि सात्विक पदार्थ), आणि श्राद्धासाठी आवश्यक इतर वस्तूंचा समावेश असतो. श्राद्ध करण्यापूर्वी संकल्प करा. संकल्प म्हणजे श्राद्ध कोणत्या हेतूने करत आहात हे ठरवणे. यामध्ये तुम्ही ज्या पूर्वजांसाठी श्राद्ध करत आहात, त्यांचे नाव आणि गोत्र उच्चारू शकता. तर्पण करणेही महत्त्वाचे आहे. तर्पण करताना पितरांना पाणी आणि तीळ अर्पण केले जातात.
घरात सतत अशा अडचणी म्हणजे पितृदोष! श्राद्धपक्षात पंचबली कर्म यासाठी करणं गरजेचं
श्राद्ध विधीमध्ये पिंडदान केलं जातं. पिंड हे तांदूळ आणि जवसापासून बनवले जाते. हे पिंड पितरांना अर्पण केले जातात. श्राद्धानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. हे भोजन सात्विक असावे. शक्य असल्यास, भोजन पुरणपोळी, खीर, आणि इतर आवडत्या पदार्थांचे बनवले जाते. नवमी श्राद्ध केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
माहेर असो की सासर! नाकाजवळ इथं तीळ असलेल्या महिला पूर्ण कुटुंबाला श्रीमंत बनवतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)