TRENDING:

Ganesh Chaturthi 2025: सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी; असं आणावं मूर्तीमध्ये देवत्व

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना काही नियम कटाक्षानं पाळावे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणि चैतन्य आणणे, जेणेकरून ती केवळ एक मातीची किंवा धातूची कलाकृती न राहता, साक्षात गणेश देवाचे रूप बनेल. हा विधी योग्य..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यंदा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी तिथी असून सार्वजनिक गणेश मंडळांना बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. गणेश मंडळांनी आत्तापासून जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सणांपैकी एक असतो, कोकणसह राज्यातील विविध भागांमध्ये त्याची निरनिराळ्या पद्धतीनं पूजा केली जाते. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना काही नियम कटाक्षानं पाळावे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीमध्ये देवत्व आणि चैतन्य आणणे, जेणेकरून ती केवळ एक मातीची किंवा धातूची कलाकृती न राहता, साक्षात गणेश देवाचे रूप बनेल. हा विधी योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने करणे आवश्यक असते. आज याविषयी सविस्तर समजून घेऊ.
News18
News18
advertisement

सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी-

गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा विधी हा साधारणपणे अनुभवी पुरोहित/ गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली केला जातो. त्याची माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गणेश मूर्ती शास्त्राप्रमाणे असावी, सुबक आणि दोषमुक्त असावी. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीला पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर), गंधोदकाने (चंदनाच्या पाण्याने) आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करून शुद्ध केले जाते. याला प्रोक्षण असे म्हणतात मूर्तीची स्थापना करताना ती एका स्थिर आणि स्वच्छ आसनावर करावी. मूर्ती हलणार नाही याची काळजी घ्यावी. मूर्तीचे मुख शक्यतो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असावे.

advertisement

गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा बाजूला एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश स्थापित केला जातो. कलशात पाणी, थोडे तांदूळ, सुपारी, नाणे, हळद-कुंकू, आंबा किंवा विड्याची पाने आणि एक नारळ (शेंडी असलेला) ठेवला जातो. कलशाच्या तोंडावर नारळ ठेवतात. हा कलश सर्व देवतांचे आवाहन आणि साक्षी म्हणून असतो. गणपतीच्या मूर्तीमध्ये गणपतीचे आवाहन करण्यासाठी मंत्र म्हटले जातात. 'आवाहनं समर्पयामि' असे म्हणून गणपतीला मूर्तीत वास करण्याची प्रार्थना केली जाते.

advertisement

प्राणप्रतिष्ठा मंत्र पठण: हा विधीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पुरोहित विशिष्ट वैदिक मंत्रांचे जसे की 'ॐ प्राण प्रतिष्ठाय नमः', 'मनोजूतिर्जुषतामाज्यस्य' पठण करतात. या मंत्रांच्या उच्चाराने मूर्तीमध्ये चैतन्य आणि प्राणशक्ती संचारित केली जाते, अशी मान्यता आहे. मंत्रांसोबत, मूर्तीच्या विविध अवयवांना (डोळे, कान, नाक, तोंड, हृदय, हात, पाय) स्पर्श करून त्या-त्या अवयवांमध्ये प्राणशक्ती स्थापित केली जाते. काही ठिकाणी डोळे उघडण्याचा विधीही करतात.

advertisement

दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार

षोडशोपचार पूजा (सोळा उपचार): प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर, गणपतीची षोडशोपचार (सोळा उपचारांनी) पूजा केली जाते. यामध्ये गणपतीचे ध्यान करणे. गणपतीला मूर्तीत येण्याचे आवाहन करणे. आसन अर्पण करणे. पाय धुण्यासाठी पाणी देणे. हात धुण्यासाठी पाणी देणे.आचमनासाठी पाणी देणे. अभिषेक (दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत आणि शुद्ध जल). वस्त्र अर्पण करणे. जानवे अर्पण करणे.

advertisement

चंदन, कुंकू, हळद, अष्टगंध अर्पण करणे. फुले आणि हार अर्पण करणे. दुर्वा आणि शमीपत्र विशेष महत्त्वाचे. धूप लावणे. दिवा लावणे. मोदक, लाडू, फळे इत्यादींचा नैवेद्य दाखवणे. विड्याचे पान, सुपारी, लवंग, वेलची अर्पण करणे. गणपतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार करणे. मंत्रांनी फुलांनी गणपतीची स्तुती करणे. गणपतीची आरती करणे.

नवग्रह आणि इतर देवतांची पूजा:

गणपतीच्या पूजेसोबतच नवग्रह, दिक्पाल (दिशांचे रक्षक) आणि इतर संबंधित देवतांचीही पूजा केली जाते, जेणेकरून पूजेमध्ये कोणतेही विघ्न येऊ नये. पूजा झाल्यानंतर पूर्णाहुती दिली जाते आणि त्यानंतर मंडळात गणेशाची स्थापना झाली असे मानले जाते. विसर्जनाच्या दिवशी गणपतीला पुन्हा प्रार्थना करून त्यांचे मूर्तीतील चैतन्य आपल्या निवासस्थानी किंवा मूळ स्थानी परतण्याची प्रार्थना केली जाते आणि मूर्तीचे विसर्जन केले जाते.

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही समाजाच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने केली जाते. हा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो समाजाला एकत्र आणणारा, धार्मिक आणि सांस्कृतिक एकोपा वाढवणारा एक महत्त्वाचा सोहळा असतो. प्राणप्रतिष्ठा विधी हा खूप पवित्र असल्याने तो शुद्ध मनाने, भक्तिभावाने आणि योग्य मंत्रोच्चारानेच केला पाहिजे.

आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जबरदस्त! शनिदेव मेहरबान असल्यानं 2 वर्षे या राशींचेच

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ganesh Chaturthi 2025: सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी; असं आणावं मूर्तीमध्ये देवत्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल