सर्वपितृ अमावास्येचे महत्त्व - सर्वपितृ अमावस्या हा पितृ पक्षाचा शेवटचा दिवस आहे. तर्पण किंवा श्राद्धाद्वारे स्मरणात न राहिलेल्या सर्व पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेले कर्म आणि दान थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील त्रास कमी होतात. काही कारणास्तव पितृपक्षात श्राद्ध किंवा पिंडदान केले गेले नाही, तर या दिवशी तिलांजली अर्पण करून दान केल्याने पूर्वजांना शांती मिळते.
advertisement
दान, तर्पण आणि श्राद्धाची परंपरा - हिंदू परंपरेत तर्पण, पिंडदान आणि दानाचे खूप महत्त्व आहे. या दिवशी लोक पवित्र नद्या, तलाव किंवा इतर जलाशयांच्या काठावर तर्पण करतात. कुश गवत, तीळ, पाणी आणि धान्य वापरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण आणि गरजूंना अन्न, कपडे, गूळ, तीळ आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्या जातात. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळतेच, शिवाय कुटुंबालाही शुभ परिणाम मिळतात.
जिथं जातील तिथं पहिल्या नंबरातच..! या जन्मतारखांच्या मुली कुटुंबाचं नशीब पालटतात
शिवलिंगावर अर्पण करायच्या वस्तू -
1. गंगाजल आणि कच्चे दूध: शिवलिंगावर यांचं मिश्रण अर्पण केल्यानं पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पापं कमी होतात.
2. काळे तीळ आणि जव: शनी आणि पूर्वजांशी संबंधित त्रास असलेल्यांसाठी हे अर्पण विशेषतः फलदायी मानले जाते.
3. बिल्व पान: 108 बिल्व पानं अर्पण करून प्रत्येकावर 'ओम' लिहिणे अत्यंत शुभ मानले जाते.
4. शमी पानं: शनिदेवांना प्रिय असलेली शमी पानं शिवलिंगावर अर्पण केल्याने पापं दूर होतात आणि शांती मिळते.
5. पांढरी फुले आणि तुपाचा दिवा: हे अर्पण केल्याने भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाकडून आशीर्वाद मिळतो, घरात शांती आणि आनंद टिकतो.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)