आपल्याला माहिती असेलच की, तळहातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात – जीवनरेषा, हृदयरेषा, विवाहरेषा, सूर्यरेषा, संततीरेषा आणि याचप्रमाणे एक भाग्याची रेषा देखील असते. भाग्यरेषा चांगले भविष्य दर्शवते. ही रेषा मणिबंधापासून (मनगटाजवळील भाग) सुरू होऊन तर्जनी (पहिली बोट) किंवा मध्यमा बोटापर्यंत (मधले बोट) पोहोचते. या रेषेला शनिरेषा असंही म्हणतात. भाग्यरेषेबद्दल सविस्तर माहिती आणि तिचा जीवनावरील परिणाम जाणून घ्या.
advertisement
अशा लोकांना मिळते भाग्याची साथ - हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्यांच्या हातावर खोलवर, स्पष्ट आणि लांब भाग्यरेषा असते, त्यांना भाग्याची चांगली साथ मिळते. असे मानले जाते की हे लोक कमी मेहनतीतच चांगले स्थान प्राप्त करतात. त्यांच्याकडे पैशाची कधीच कमतरता नसते. हे लोक जीवनात सर्व भौतिक सुख प्राप्त करतात. तसेच हे लोक कमी वयातच श्रीमंत होतात. हे लोक व्यवसायात जोखीम घेऊन खूप धन कमावतात. त्याचबरोबर या लोकांना जीवनात खूप मान-सन्मान मिळतो.
खूप धन-संपत्तीचे असतात मालक - जीवनरेषेपासून सुरू झालेली भाग्यरेषा अत्यंत शुभ मानली जाते. असे लोक मेहनती आणि कष्टाळू असतात. तसेच हे लोक आपल्या मेहनतीने नाव आणि प्रसिद्धी मिळवतात. अशा लोकांकडे खूप धन-संपत्ती असते आणि त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते.
35 वर्षांनंतर चमकते नशीब - हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या हातात भाग्यरेषा मस्तिष्क रेषेपासून (डोक्याची रेषा) सुरू होते, अशा लोकांचे नशीब 35 वर्षांनंतर चमकते. तसेच हे लोक या वयानंतर वेगाने प्रगती करतात. त्याचबरोबर त्यांना सरकारी नोकरी 35 वर्षांनंतर मिळते.
ज्या लोकांची भाग्यरेषा मस्तिष्क रेषेवर येऊन थांबते, याचा अर्थ असा होतो की तुम्ही चुकीच्या निर्णयामुळे अडचणीत येऊ शकता. तसेच हे लोक दुसऱ्यांची मदत करणारे असतात. हे लोक खूप दानशूर स्वभावाचे असतात.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
