TRENDING:

पूर्वीच्याकाळी दोन नावं का ठेवली जायची, राशी नाव गुप्त ठेवण्यामागचं 'हे' सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का?

Last Updated:

हिंदू संस्कृतीमध्ये मुलाचे बारसे करताना दोन नावे ठेवण्याची परंपरा जुनी आहे. एक म्हणजे 'राशी नाव' जे जन्म कुंडलीनुसार असते आणि दुसरे म्हणजे 'व्यावहारिक नाव'.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rashi Naav Secret : हिंदू संस्कृतीमध्ये मुलाचे बारसे करताना दोन नावे ठेवण्याची परंपरा जुनी आहे. एक म्हणजे 'राशी नाव' जे जन्म कुंडलीनुसार असते आणि दुसरे म्हणजे 'व्यावहारिक नाव'. अनेकदा पालकांना प्रश्न पडतो की, जर राशीनुसार नाव काढले आहे, तर तेच नाव व्यवहारात का वापरू नये? किंवा दोन्ही नावे वेगळी का असावीत?
News18
News18
advertisement

जन्म राशी आणि नक्षत्राचा आधार

बाळाचा जन्म ज्या वेळी होतो, त्या वेळी चंद्र ज्या राशीत आणि ज्या नक्षत्रात असतो, त्यावरून त्याची 'जन्म रास' ठरते. नक्षत्राच्या विशिष्ट चरणावरून एक अक्षर निघते, त्याला 'आरंभ अक्षर' म्हणतात. या अक्षरावरून ठेवलेले नाव म्हणजे राशी नाव. हे नाव बाळाच्या कुंडलीशी आणि नशिबाशी थेट जोडलेले असते.

advertisement

नकारात्मक शक्तींपासून संरक्षण

प्राचीन काळी अशी श्रद्धा होती की, एखाद्या व्यक्तीचे राशी नाव जर सर्वांना माहित झाले, तर त्याचा वापर करून कोणीही त्या व्यक्तीवर करणी-बाधा किंवा काळी जादू करू शकतो. त्यामुळे राशी नाव 'गुप्त' ठेवण्याची पद्धत पडली आणि व्यवहारात वापरण्यासाठी दुसरे नाव ठेवले जाऊ लागले.

ध्वनी लहरींचा प्रभाव

प्रत्येक नावाच्या उच्चारातून ठराविक ध्वनी लहरी निर्माण होतात. राशी नाव हे तुमच्या मूळ प्रकृतीला आणि ग्रहांना शांत करण्यासाठी असते. मात्र, व्यावहारिक नाव हे तुमच्या सामाजिक प्रतिमेसाठी असते. ज्योतिषशास्त्रानुसार, काही अक्षरे तुमच्या राशीला अनुकूल नसतात. जर व्यवहारात चुकीच्या अक्षराचे नाव वापरले गेले, तर प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

advertisement

नावाचा 'अवकहडा' तक्ता

ज्योतिषशास्त्रात 'अवकहडा' चक्राचा वापर करून नावाचे पहिले अक्षर निश्चित केले जाते. जर जन्म राशीनुसार नाव न ठेवता केवळ आवडीनुसार नाव ठेवले, तर त्या नावाचा आणि व्यक्तीच्या कुंडलीचा ताळमेळ बसत नाही. व्यावहारिक नाव हे सहसा टोपणनाव किंवा आई-वडिलांच्या आवडीनुसार असते, जे सामाजिक संवादासाठी सोपे ठरते.

कुंडलीतील 'नाम रास' आणि 'जन्म रास'

advertisement

ज्यांचे जन्म नाव माहित नसते, त्यांची रास त्यांच्या व्यावहारिक नावाच्या पहिल्या अक्षरावरून ठरवली जाते, त्याला 'नाम रास' म्हणतात. मात्र, विवाहाच्या वेळी किंवा मोठ्या धार्मिक विधींच्या वेळी नेहमी 'जन्म रास' महत्त्वाची मानली जाते.

व्यवहारातील सोय

अनेकदा राशीवरून येणारी अक्षरे ही नावांसाठी थोडी कठीण किंवा जुन्या पद्धतीची वाटू शकतात. आधुनिक काळात पालकांना आपल्या मुलांचे नाव युनिक आणि अर्थपूर्ण हवे असते. म्हणूनच राशीचे अक्षर निवडून केवळ कुंडलीसाठी ते नाव वापरले जाते आणि शाळेत किंवा कागदपत्रांवर वेगळे नाव लावले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
पूर्वीच्याकाळी दोन नावं का ठेवली जायची, राशी नाव गुप्त ठेवण्यामागचं 'हे' सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल