नवीन नियम काय आहे?
केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे आणि नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, एखादा वाहनचालक वैध फास्टॅगशिवाय टोल प्लाझावर प्रवेश करतो आणि रोख रक्कम भरतो, तर त्यांच्याकडून दुप्पट टोल शुल्क आकारले जाईल. तसंच, दिलासा असा आहे की जर तोच चालक UPI किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमाचा वापर करून पैसे भरत असेल तर त्यांना टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट जास्त पैसे द्यावे लागतील. याचा अर्थ असा की, आता वाहनचालकांना रोख रकमेपेक्षा डिजिटल पेमेंटद्वारे कमी पैसे द्यावे लागतील.
advertisement
Yamaha ने सादर केला इलेक्ट्रिक स्कूटर्सचा बाप Aerox! सिंगल चार्जमध्ये धावेल 106km
उदाहरण:
- समजा तुमच्या वाहनाचा टोल 100 रुपये आहे.
- जर FASTag काम करत असेल तर तो फक्त 100 रुपये असेल.
- जर FASTag फेल झाला आणि तुम्ही कॅशमध्ये पैसे भरले तर तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील.
- FASTag फेल झाला आणि तुम्ही UPI वापरून पैसे भरले तर तुम्हाला 125 रुपये द्यावे लागतील.
- याचा अर्थ असा की आता डिजिटल पेमेंटवर थेट दिलासा मिळेल, तर रोख व्यवहारांवर जास्त शुल्क आकारले जाईल.
Tollवर तुमचं FASTag चालत नाहीये? लगेच करा हे काम, अनेकांना माहितीच नाही
सरकारने हा बदल का केला?
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) मते, या दुरुस्तीचा उद्देश टोल संकलन प्रणाली पारदर्शक करणे, रोख व्यवहार कमी करणे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की या निर्णयामुळे टोल प्लाझावरील लांब रांगा कमी होतीलच, शिवाय प्रवाशांना जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभवही मिळेल.
याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होईल?
ज्या चालकांना काही कारणास्तव FASTag स्कॅन करता येत नाही किंवा ज्यांचा टॅग कालबाह्य झाला आहे त्यांच्यासाठी हा बदल विशेषतः फायदेशीर ठरेल. पूर्वी त्यांना दुप्पट टोल भरावा लागत होता, परंतु आता त्यांना UPI द्वारे पैसे देऊन दिलासा मिळेल.
