मुजफ्फरपुर : सध्या अनेक तरुणांमध्ये टॅटू काढण्याची क्रेझ वाढत आहे. काही तरुणांच्या अंगावर तात्पुरते टॅटू असतात तर काहींच्या अंगावर कायमस्वरूपी टॅटू दिसतात. मात्र, तुम्हालाही टॅटू बनवण्याची आवड असेल आणि तुम्हाला अग्निवीर बनायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
तुम्ही शरीराच्या काही निवडक भागांवरच टॅटू काढला तरच तुम्ही अग्निवीर होण्यासाठी पात्र ठरू शकतात. मुझफ्फरपूर येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून याबाबत एक मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यामुळे, टॅटू काढण्यापूर्वी, निश्चितपणे या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करायला हवे. तसे न केल्यास शारीरिकदृष्ट्या फीट असूनही तुमचे अग्निवीर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही.
advertisement
ज्या उमेदवारांनी अंगावर टॅटू काढले आहेत, त्यांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही उमेदवाराला केवळ आतील चेहऱ्यावर म्हणजे कोपरच्या आतील बाजूपासून मनगटापर्यंत आणि तळहाताच्या मागील बाजूस, हाताच्या मागील बाजूस धार्मिक भावनांचे कायमस्वरूपी शरीरावर टॅटू काढण्याची परवानगी आहे.
शरीराच्या इतर कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू असले तर उमेदवाराला निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल. यासोबतच आदिवासी समुदाय आणि आदिवासी भागातील उमेदवारांना विद्यमान प्रथा आणि परंपरांनुसार शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू काढण्याची परवानगी असेल. पण यासोबतच अशा उमेदवारांसाठी टॅटूबाबतही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश घ्यावे लागतील -
उमेदवारांना स्वाक्षरी केलेले स्व-साक्षांकित प्रमाणपत्र भरुन त्याची पडताळणी करुन ते जमा करावे लागेल. यासोबतच आदिवासी समाजाचे प्रमाणपत्र आणि शरीरावर कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी परवानगीवर त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. स्वाक्षरी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव आणि पदाचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. त्याबाबतचे एक फॉरमॅटही कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
22 मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार -
मुझफ्फरपूर आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, अग्निवीरसाठी नोंदणी प्रक्रिया 22 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. 22 एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. याबाबत, प्रवेशपत्र एक आठवडा अगोदर दिले जाईल. यासाठी सर्व जिल्ह्यांतून मिळून दररोज सुमारे 1 हजार अर्ज येत आहेत, असे सांगण्यात आले.
