नेमकं घडलं काय?
25 मार्च रोजी शेतात पाटाचे पाणी आणि मोबाईल पाण्यात फेकल्यावरून 13 वर्षीय मुलाचा महिलेशी वाद झाला होता. या रागातून मुलाने 41 वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारले. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत खुनाचा छडा लावला. पोलीस तपासानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
advertisement
मावस भाऊ-बहिणीनं गुपचूप उरकलं लग्न, बदनामीची भीती अन् पुढं भलतंच कांड!
असा झाला उलगडा
या घटनेनंतर गावातील काही लोकांनी एका मुलाला शेतातून पळताना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना या मुलाचे वर्णन दिले, ज्यामुळे पोलिसांना तपासात मदत झाली. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि तीर्थपुरी पोलिसांनी एकूण 7 संशयितांची चौकशी केली. अखेरीस शेजारील शेतातून पळणाऱ्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली. या तपासात पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी विशाल खांबे यांच्यासह एलसीबीचे पोनि. पंकज जाधव, तीर्थपुरी पोलिस ठाण्याचे साजिद अहमद आणि इतर अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.






