अरुंधती आणि आशुतोष यांच्या सुखी संसारात मनूची एंट्री होते आणि सगळं होत्याचं नव्हतं होतं. मनूची खरी आई माया तिला आशुतोषपासून दूर करते. मनूला परत आणण्यासाठी निघालेल्या अरुंधती आणि आशुतोष यांचा रस्त्यात अपघात होतो आणि या अपघातात आशुतोषचा जागीच मृत्यू होतो. आशुतोषच्या जाण्यानं अरुंधतीला मोठा धक्का बसतो.
( हेही वाचा - Juna Furniture : 'ह्या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा'; महेश मांजरेकर दमदार भूमिकेत, Teaser आऊट )
advertisement
मालिकेच्या येणाऱ्या भागाचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात आशुतोषच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. अरुंधतीची अवस्था अत्यंत कठीण झालेली असताना आशुतोषची आई म्हणजेच सुलेखा ताई आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरतात. अरुंधतीशी असलेले सगळे संबंध तोडतात. अशावेळी अरुंधतीची पहिली सासू म्हणजे कांचन आई तिची आई बनून तिच्या पाठिशी उभी राहते.
प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, कांचन अरुंधतीला तिच्या घरी घेऊन जायला तयार होते. तर दुसरीकडे दुसऱ्या नवऱ्याचं निधन झाल्यानंतर आता अरुंधतीचा पहिला नवरा म्हणजेच अनिरुद्ध देखील तिच्या मदतीला पुढे आला आहे. आशुतोषच्या निधनानं शॉकमध्ये गेलेल्या अरुंधतीला अनिरुद्ध म्हणतो, "तू आता एकटी नाहीस. मी कायम तुला साथ देईन". त्यावर कांचन म्हणते, "आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊया का?"
कांचन आणि अनिरुद्धच्या अशा वागण्यानं तिकडे संजना देखील शॉक होते. अरुंधतीला पुन्हा एकदा समृद्धी बंगल्यात परत आणण्यासाठी संजनाचा पहिल्यापासून विरोध असतो. घर आणि अनिरुद्ध दोन्हीही माझे असल्याची भावना संजनाच्या मनात येते आणि सगळं आपल्याबाजूने करण्याचे प्रयत्न ती सुरू करते.
समृद्धी बंगला हा आप्पांच्या नावावर आहे. आप्पांनी ते घर अरुंधतीच्या नावावर केलं आहे. ते तिनं अनिरुद्धच्या नावावर केलं तर ते त्यांना मिळेल अशी माहिती संजना वकिलांकडून मिळवते. "आता जे काही आहे ते माझं आहे. ते घर ही आणि अनिरुद्धसुद्धा", असं संजना म्हणते. आता अरुंधती पुन्हा एकदा देशमुखांकडे राहायला गेल्यानंतर देशमुखांच्या घरात नेमकं काय घडणार? आशुतोषच्या दु:खातून अरुंधती स्वत:ला कशी सावरणार? अरुंधतीच्या आयुष्याची ही नवी इनिंग तिला कोणत्या दिशेनं घेऊन जाणार? हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.