7 सप्टेंबर रोजी जुहू चौपाटीवर या तिघांनी समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा स्वतः हाताने उचलला. फडणवीस यांची लहान मुलगीही या उपक्रमात सहभागी झाली. समाजात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी, हा उद्देश त्यांच्या मागे होता. अक्षय कुमारने साफसफाईदरम्यान सांगितले, "स्वच्छता ही केवळ बीएमसी किंवा सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. आपण सर्वजण मिळूनच शहर स्वच्छ ठेवू शकतो."
advertisement
सेट बघायला आले अन् दिली थेट लीड रोलची ऑफर, न्यूज चॅनलची इंटर्न कशी बनली प्रसिद्ध अभिनेत्री?
यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनीही हजेरी लावली. जवळपास 50 हून अधिक पिशव्या कचऱ्याने भरल्या गेल्या. निर्माल्य वेगळं गोळा करून पुढे खत निर्मितीसाठी देण्यात आलं.
या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. अनेकांनी अक्षय आणि अमृताचे कौतुक केले. मात्र काहींनी "कॅमेरा बंद म्हणजे सफाई बंद", "सगळं नाटक आहे" अशा कमेंट्स करत ट्रोलही केले.