“माझी नणंद आणि कुमार सानू…”
रीटा भट्टाचार्यने ‘फिल्म विंडो’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “कुमार सानूच्या वडिलांनी म्हातारपणी लग्न केलं होतं. त्यांच्या घरात लग्नानंतर प्रेमसंबंध असणं ही खूप सामान्य गोष्ट होती. कुमार सानूची एक विवाहित बहीण होती, तिला तीन मुलं होती आणि तिचा नातूही झाला होता, पण तिने तिच्या नवऱ्याला सोडून तिच्या प्रियकराला सोबत घेऊन माझ्या घरी आली होती.”
advertisement
रीटा पुढे म्हणाली, “मी कुमार सानूला सांगितलं होतं की, तिच्यावर चुकीचा परिणाम होईल, पण तो खुश होता. कारण त्यालाही तेच करायचं होतं. माझी नणंद कुमार सानूसोबत रात्रभर एकाच खोलीत असायची. दोघे एकत्र झोपायचे, रात्रभर गप्पा मारायचे आणि जेवायचे. कुमार सानूच्या घरातील सगळ्यांचेच बाहेर प्रेमसंबंध होते. तिच्यामुळेच आमची घरं तुटली”
कुमार सानूचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत!
रीटाने केलेले हे आरोप खूपच गंभीर आहेत, ज्यामुळे कुमार सानूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रीटाने केलेल्या या खुलास्यांवर कुमार सानू काय प्रतिक्रिया देतात, हे आता पाहणं महत्त्वाचं आहे.