TRENDING:

Gautami Patil : महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या गौतमीला पुढील काही दिवस 'या' जिल्ह्यात नाही लावता येणार ठुमके

Last Updated:

गौतमी पाटीलचे कार्यक्रम म्हणजे चांगलीच गर्दी होणार हे समीकरण ठरलेलं आहे. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात तरूणांची हुल्लडबाजी चालते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 20 सप्टेंबर : डान्सर गौतमी पाटील हिचे कार्यक्रम सध्या दणक्यात सुरू आहेत. सण-उत्सुक जवळ आल्यानंतर गौतमीच्या कार्यक्रमांना आणखी वेग येतो. पण पुढचे काही दिवस गौतमीला कोल्हापूरमध्ये तिचे कार्यक्रम करता येणार नाहीत. गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातील कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नुकतंच गणपतीचं आगमन झालं आहे. गणपती विसर्जन होताच काहीच दिवसात नवरात्र उत्सव देखील सुरू होतं आहे. या दोन्ही सणांना कोल्हापूरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. लांबून लांबून भाविक कोल्हापूरात देवदर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांसाठी सुरक्षा तैनात करणं देखील पोलिसांच्या ड्युटीचा महत्त्वाचा भाग असतो.
गौतमी पाटील
गौतमी पाटील
advertisement

गौतमी पाटीलचे कार्यक्रम म्हणजे चांगलीच गर्दी होणार हे समीकरण ठरलेलं आहे. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात तरूणांची हुल्लडबाजी चालते. बऱ्याच वेळा कार्यक्रमात मारामारी, चेंगरा चेंगरी होते आणि निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिसांच्या आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना देखील डोकेदुखी होऊन बसते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम कोल्हापूरात ठेवू नयेत अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील करवीर आणि राधानगरी येथील गावातील कार्यक्रमांना परवानगी नाकारली नाकारण्यात आली आहे.  जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडतील असे कार्यक्रम ठेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत.

advertisement

हेही वाचा - Parineeti Raghav Wedding: राघव चड्ढापेक्षा 10 पट जास्त आहे परिणीतीची नेटवर्थ! कशी झाली दोघांची भेट?

नुकताच दहीहंडी उत्सव साजरा झाला. दहीहांडीनिमित्तानं देखील अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गौतमीला मुंबईतील कार्यक्रमांचं देखील खास आमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबईतील बोरिवरी आणि मुलुंड येथील मानाच्या दहीहंडीला गौतमी आली होती. दहीहंडी उत्सवात गौतमीनं 'पाव्हन जेवला काय?', म्हणत मुंबईच्या प्रेक्षकांवरही मोहिनी घातली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

दरम्यान गौतमी पाटीलच्या मुंबईतील कार्यक्रमांनंतर बरंचस ट्रोलिंग झालं. हदीहंडी कार्यक्रमात डान्स करण्याच्या तीन दिवस आधीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. धुळ्यामध्ये गौतमीचे वडील बेवारस परिस्थितीमध्ये आठळले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर गौतमीनं वडिलांना  मदत देखील केली होती. वडिलाच्या मृत्यूनंतर त्यांना अखेरचा निरोप देताना गौतमी अत्यंत भावुक झाली होती.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या गौतमीला पुढील काही दिवस 'या' जिल्ह्यात नाही लावता येणार ठुमके
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल