शरद पोंक्षे लवकरच 40 वर्ष जुनं नाटक ''पुरुष'' पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी ABP माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
''पुरुष'' नाटकाच्या संपूर्ण टीमसह शरद पोंक्षेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खुलासा केला की, अनेकजण त्यांच्या मरणाची वाट पाहतात. सोशल मीडियावर पोस्टखाली ते कमेंट करत माझ्या मरणाच्या गोष्टी करतात. अनेकजण मला शिव्या घालतात, अनेकांनी म्हटलं तू मुलीला अमेरिकेला शिकायला पाठवलं. ते पुढे म्हणाले ''पुरुष'' नाटकाची पोस्ट टाकली मात्र लोक कमेंट करत अगदी वेगळ्याच गोष्टी मला विचारत होते.
advertisement
''अजून जिवंत कसा?'' अशा कमेंटवर रिप्लाय देताना शरद पोंक्षे म्हणाले, ''मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे मला त्याची भीती नाही.''
पुढे ते म्हणाले, ''मध्ये एकदा 2019 मध्ये अशीच वेळ आलेली, पण ती ठरलेली वेळ आणि ठिकाण नव्हतं, त्यामुळे त्यातूनही बाहेर आलो मी. हा तर पोटात गोळा आला असेल लोकांच्या की हा अजून कसा मरत नाही. अजून शरद पोंक्षे मेला नाही वाटतं हा, अजूनही जिवंत आहे वाटतं हा, असंस्कृतपणाचा कळस ठायी ठायी दिसतो. त्यामुळे 'हाथी चले अपनी चाल, कुत्ते तो भोंकते रहते है', त्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नाही. कोण काय करणार आहे....'' शरद पोंक्षेंचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.
दरम्यान ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांचं ''पुरुष'' नाटक जवळपास 40 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचे 50 प्रयोग होणार आहेत. यवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे नाटक असणार आहे.
