एका मुलाखतीमध्ये विनय आर. आनंद म्हणालाय की, "मी नेहमीच माझा मामा गोंविदा याच्या संपर्कात आहे. अलीकडेच मी त्यांना भेटलो सुद्धा आहे. शिवाय, मी मामी सुनीतासोबतही फोनवर बोलत असतो." पुढे विनय असंही म्हणाला की, "परंतू मीच आता मामीला घाबरतोय. जर त्यांनी माझ्या मामाची वाट लावली आहे, तर त्या माझी वाट लावायलाही कमी करणार नाही. जर मी काही बोललो तर माझीच अडचण होईल. कोण रिस्क घेणार आहे?" विनय आनंदने मामा- मामीच्या घटस्फोटाबद्दलही महत्त्वपूर्ण विधान केलंय, तो म्हणाला की, "देवाने असं नको करायला. जर एखादं नातं तुटण्याबद्दल आधीच ठरलेलं असेल, तर मग कुणीही काहीही करू शकत नाही. अजूनपर्यंत ते दोघे एकत्र आहेत. म्हणजेच देवाची इच्छा आहे की, काहीही वाईट घडू नये. मामांनी मला सांगितलं की हा त्यांचा कठीण काळ आहे. ते देवाकडे प्रार्थना करत आहेत की हा वाईट काळ दूर व्हावा."
advertisement
"मी मामाला विचारलं खरंच असं काही आहे का, तर त्यांनी मला नाही असं सांगितलं. आता मी हेही म्हणणार नाही की, माझी मामी चुकीची आहे. त्यांना काहीतरी जाणवलं असेल आणि आता त्यांना सर्व काही पटवून देणारेही फक्त मामाच आहेत. पण मला आशा आहे की दोघांमध्ये जे काही सुरू आहे ते लवकरच ठीक होईल. मामा- मामी चुकीचे नाहीत." असंही विनय म्हणाला. दरम्यान, विनय आनंद विषयी बोलायचं तर, विनय आनंद भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. अलीकडेच त्याने एकता कपूरच्या 'एसीपी विक्रांत' वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 19 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर विनयने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं आहे.
गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 39 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी 11 मार्च 1989 साली लग्नगाठ बांधली होती. गोविंदा आणि सुनीताने कोणालाही न कळवता लग्नगाठ बांधली होती. त्यांना मुलगी टीना आणि मुलगा यशवर्धन अशी दोन मुलं आहेत. लवकरच यशवर्धन बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. साजिद खानच्या एका हॉरर चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. त्या चित्रपटात यशवर्धनची हिरोईन म्हणून 'लापता लेडीज'फेम नितांशी गोयल झळकणार आहे.
