'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गेल्या 18 वर्षांत अनेक बदल झाले. अनेक लोकप्रिय कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम केला. काही कलाकारांनी निर्माता असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. कुणी पैसे न दिल्याचा, कुणी शोषणाचा तर कुणी लैंगिक छळाचे आरोप केले. या आरोपांमुळे असित मोदी यांचा शो अनेकदा वादात राहिला. हळूहळू अनेक जुने कलाकार शोमधून बाहेर पडले.
advertisement
अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात 'तारक मेहता...'
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बरेच नवे कलाकार आहेत. टप्पू सेना आता मोठी झाली असून जवळपास सर्व कलाकारांनी शोला अलविदा केलं आहे. प्रसिद्ध कलाकारांच्या एकेका करून शो सोडल्यानंतर अनेक वर्षांपासून चर्चा आहे की 'तारक मेहता…'चा टीआरपी घसरला आहे आणि शो लवकरच बंद होऊ शकतो. अलीकडेच या शोचा निर्माता असित मोदी यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
'तारक मेहता…' ऑफ-एअर होणार? असित मोदींची स्पष्ट भूमिका
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफ-एअर होणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत असित मोदी ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी’च्या 25 व्या वर्षगाठ कार्यक्रमात म्हणाले की असं काहीही नाही. ते म्हणतात, शो बंद होणार नाही आणि त्यांच्यात जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत ते हा शो चालवत राहतील.
