Weather Alret : मुंबई–पुण्यात थंडीची लाट कायम, जळगावात पारा आणखी घसरला, हवामान खात्याचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून रात्री वाढलेली थंडी सकाळी जरी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी तापमान थोडं वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आकाश स्वच्छ, हवा कोरडी आणि ढगांची उपस्थिती कमी राहील.
आज राज्यभर हवामानात हलका बदल जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री वाढलेली थंडी सकाळी जरी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी तापमान थोडं वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आकाश स्वच्छ, हवा कोरडी आणि ढगांची उपस्थिती कमी राहील. कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही. किनारी भागात सकाळचा गारवा जाणवेल, तर उत्तर महाराष्ट्रात थंडी आजही कायम आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळी हलका गारवा जाणवेल. कालच्या तुलनेत किमान तापमान किंचित वाढून 18–19°C, तर दिवसा 30–31°C राहील. दुपारी हलकी उब जाणवेल पण दमटपणा तुलनेने कमी राहणार आहे. पालघरमध्ये गारवा अधिक असून सकाळी तापमान 16–17°C, दिवसा 29–30°C नोंदले जाईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी 17–19°C पर्यंत थंडी जाणवेल, तर दुपारी तापमान 30–32°C राहील. कोकणात हवामान स्वच्छ, स्थिर आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाण्यात आज सकाळी गारवा किंचित वाढलेला जाणवेल. किमान तापमान 18°C च्या आसपास, तर दिवसा 30–32°C पर्यंत उब जाणवेल. नवी मुंबईतही सकाळी हलकी थंड हवा राहील आणि दुपारी सामान्य तापमान परत वाढेल. कल्याण–डोंबिवली भागात सकाळचे तापमान 16–17°C, तर दिवसा 29–31°C राहील. या पट्ट्यात हवामान एकूण शांत आणि कोरडे राहील.
advertisement
advertisement
उत्तर-मध्य महाराष्ट्र या विभागात आज सकाळी थंडी कालच्या तुलनेत थोडी अधिक जाणवेल. नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत तापमान 11–13°C पर्यंत घसरू शकतं, ज्यामुळे सकाळी गारवा ठळक राहील. दिवसा तापमान 28–30°C चे स्थिर चित्र दिसेल. संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे किमान तापमान 12–14°C, सोलापूरात 14–16°C राहील. दुपारी 29–31°C ची सामान्य उब असेल. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट हलकी पण सातत्यपूर्ण आहे.








