पिकांना जीवदान
एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, दुसरीकडे हा पाऊस शेतीसाठी 'अमृत' ठरत आहे. सध्या भात पीक फुलोऱ्यात आले असून, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी पावसाची नितांत गरज असल्याने, या सरींमुळे भात आणि नाचणी पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू
advertisement
दरम्यान, हवामान विभागाने मान्सूनच्या माघारीसाठी स्थिती अनुकूल असल्याचे स्पष्ट केले आहे. राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मान्सून 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान माघार घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा : ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 3 लाख 50 हजार रु, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
हे ही वाचा : कांदा अनुदान दुप्पट होणार? राज्य सरकारच्या बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय