जोडीदाराला गृहीत धरणं : नात्यात प्रेम आणि जिव्हाळा टिकवण्यासाठी एकमेकांचं कौतुक करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करायला लागता किंवा त्यांना नेहमी गृहीत धरता, तेव्हा त्यांच्या मनात दुरावा निर्माण व्हायला लागतो.
चांगला संवाद नसणं : नात्यात फक्त बोलणं नाही, तर लक्ष देऊन ऐकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असाल किंवा महत्त्वाच्या विषयांवर बोलणं टाळत असाल, तर यामुळे गैरसमज होऊ शकतात.
advertisement
क्वालिटी टाइम न घालवणं : नातं टिकवण्यासाठी वेळ आणि प्रयत्न दोन्ही आवश्यक आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदारापेक्षा कामाला किंवा इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं, तर त्यांना दुर्लक्षित वाटू शकतं, ज्यामुळे नात्यात भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.
जुन्या चुका वारंवार करणं : नात्यात काही समस्या आली असेल आणि तुम्ही त्या जुन्या चुकांची वारंवार आठवण करून देत असाल आणि त्या सोडवण्याऐवजी मनात ठेवत असाल, तर यामुळे कटुता वाढते. असं केल्याने नात्यातील प्रेम कमी होऊ लागतं.
खूप जास्त नियंत्रण ठेवणं : नात्यात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. जर जोडीदाराला खूप जास्त संशय येऊ लागला किंवा आपल्या इच्छा जोडीदारावर लादायला लागला, तर नातं गुदमरल्यासारखं वाटू शकतं.
प्रेम व्यक्त न करणं : नात्यात प्रेमाचा जिव्हाळा टिकवण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळोवेळी प्रेमळ शब्दांनी किंवा छोट्या हावभावांनी आनंदी करत नसाल, तर त्यांना एकटेपणा वाटू शकतो.
जोडीदाराची इतरांशी तुलना करणं : तुम्ही तुमच्या जोडीदाराची इतरांशी तुलना करत राहिलात आणि त्यांच्यातील कमतरता दाखवत राहिलात, तर त्यांना अपमानित आणि दुर्लक्षित वाटू शकतं. या सवयीमुळे नातं कमजोर होऊ शकतं.
नेहमी टीका करणं : तुम्ही नेहमी तुमच्या जोडीदारावर टीका करत असाल आणि त्यांच्या चांगुलपणाकडे दुर्लक्ष करत असाल, तर यामुळे नात्यातील गोडवा संपू शकतो. प्रेमात एकमेकांना स्वीकारण्याची आणि आपलंसं करण्याची भावना आवश्यक आहे.
नातं मजबूत ठेवण्यासाठी या सवयी टाळणं आणि तुमच्या जोडीदारासोबत प्रेम, आदर आणि विश्वासाचं नातं निर्माण करणं महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा : Wedding age : लग्न कधी करायचं, लग्नासाठी योग्य वय कोणतं? डॉक्टरांनीच सांगितला आकडा
हे ही वाचा : Garud Puran : बायकोवर प्रेम करत नाही त्या नवऱ्याचं काही खरं नाही, गरुड पुराणात सांगितलाय भयानक परिणाम