अंघोळ करणं म्हणजे दिवसातला स्वच्छतेसाठीचा महत्त्वाचा वेळ. स्नान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्याचं महत्त्व फार कमी जणांना समजतं. आयुर्वेदानुसार, स्नान ही केवळ शारीरिक शुद्धीकरणाची क्रिया नसून, मन आणि शरीर या दोन्हींना शांत करणारी आणि शुद्ध करणारी क्रिया आहे.
Kidney Health : डॉक्टरला न विचारता सप्लिमेंटस् घेताय ? मूत्रपिंडांवर होईल परिणाम, वेळीच ओळखा धोका
advertisement
स्नानामुळे शरीरातील दोषांचं संतुलनही साधलं जातं. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्यामुळे स्नानासाठी योग्य पाणी देखील वेगवेगळं असू शकतं.
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ यांवर आधारित स्नानाच्या पद्धतींचं वर्णन आहे. मानवी शरीर वात, पित्त आणि कफ यांच्या संतुलनानं कार्य करते आणि प्रत्येकाची स्वतःची प्रवृत्ती असते. शरीराला समजून घेऊन स्नान केल्यानं आजारपण कमी होतं आणि प्रकृती निरोगी राहते.
कोमट पाणी - शरीरात वात असेल, तर कोरडेपणा टिकून राहतो. वातामुळे हात आणि पाय थंड पडतात. म्हणून, वात प्रवृत्तीच्या व्यक्तीनं नेहमी कोमट पाण्यानं स्नान करावं आणि स्नानानंतर कोणत्याही तेलानं अभ्यंग म्हणजे तेलानं मालिश करावं. तेल लावल्यानं शरीराचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचेचं खोलवर पोषण होतं.
गरम पाणी - शरीरात कफ प्रवृत्ती असेल, तर जडपणा, थंडी आणि सुस्ती यांसारखी लक्षणं नेहमीच जाणवतात. त्यामुळे, कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कोमट पाण्यानं स्नान करावे, कारण थंड पाण्यानं स्नान केल्यानं शरीरातील कफ वाढतो. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींनी सकाळी स्नान करावं आणि दुपारनंतर स्नान करणं टाळावं. कोमट पाण्यामुळे कफ कमी होण्यास मदत होईल.
साधं पाणी - पित्त प्रकृती असेल तर शरीर खूप गरम वाटतं, चेहऱ्यावर मुरुम येतात, पोटात जळजळ होते आणि खूप घाम येतो. त्यामुळे, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी सामान्य किंवा किंचित थंड पाण्यानं स्नान करावं. खूप थंड पाण्यानं स्नान करणं टाळावं, कारण त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं. सामान्य पाणी पित्त संतुलित ठेवण्यासाठी आणि शरीराचं तापमान संतुलित राखण्यासाठी उपयुक्त ठरतं.
