हनुमान चालीसाचा महिमा अमर्याद आहे. फक्त जप किंवा ध्यान केल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात दररोज हनुमान चालीसा पठण केलं तर त्याला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढवते. धार्मिक श्रद्धेनंतर आता विज्ञानानेही आपल्या संशोधनाच्या आधारे यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात अनेक प्रयोग देखील केले गेले आहेत. याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 श्लोक आहेत. त्यापैकी बहुतेक अनुष्टुप छंदमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजेच ते लयबद्ध, पुनरावृत्ती करणारे आणि ध्यान करणारे आहेत. हे श्लोक मेंदूची वारंवारता बीटा वेव्हपासून अल्फा वेव्हमध्ये बदलतात. ज्यामुळे व्यक्तीच्या मनाला आणि मेंदूला शांतीची भावना मिळते.
Heart Attack : टीव्ही पाहिल्याने हार्ट अटॅक येतो? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
ताण कमी होतो : जेव्हा आपण रामदूत अतुलित बलधामासारखे मंत्र नियमितपणे जपतो तेव्हा त्याचे ध्वनी कंपन आपल्या शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच ताण संप्रेरक कमी करतं आणि सेरोटोनिन-डोपामाइन वाढवतं. हे आपल्या शरीराची शांती प्रणाली, पॅरासिम्पेथेटिक प्रणाली सक्रिय करते. जर्नल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिनमधील एका अभ्यासानुसार, मंत्र जप केल्याने ताण कमी होतो आणि सकारात्मक उर्जेची पातळी वाढते.
रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त : जर्नल ऑफ इव्होल्यूशन ऑफ मेडिकल अँड डेंटल सायन्सेसमधील मीरा गोयल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनानुसार, 18 ते 22 वर्षे वयोगटातील 20 एमबीबीएस विद्यार्थ्यांना 10 मिनिटं हनुमान चालीसा संगीत ऐकवण्यात आले आणि त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचं आढळून आलं.
हार्ट अटॅक आणि इतर आजार होत नाहीत : आयसीएमआर आणि एम्सच्या संशोधनानुसार, दररोज 10 मिनिटं हनुमान चालीसाचं पठण केल्याने हृदयाचे ठोके कमी होण्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत होते. यामुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, चिंता आणि एडीएचडी विकारांपासून देखील आराम मिळतो.
Heart Attack आणि Cardiac Arrest सारखं नाही, दोघांमध्ये मोठा फरक, प्रत्येकाला माहिती हवा
ज्योतिषशास्त्रज्ञ डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी न्यूज18हिंदीवर ही माहिती दिली आहे. जी फक्त सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा या दाव्याचं समर्थन करत नाही. कोणत्याही आजार किंवा समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.