TRENDING:

Diet tips : जेवताना किंवा जेवल्यानंतर पाणी प्यावं की नाही ? जेवणादरम्यान पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवताना पाणी प्यायल्यानं पचनावर परिणाम होतो का ?

Last Updated:

भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच ग्लासभर पाणी पिण्याची सवय असते. पण, ही छोटीशी सवय पचनक्रियेवर गंभीर परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागील कारणं काय आहेत ते समजून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जेवताना पाणी पिऊ नये घराघरातली शिकवण. यामागचं विज्ञान समजून घेण्याची गरज आहे कारण यामुळे शरीरात काही परिणाम जाणवत असतात.
News18
News18
advertisement

भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात खाण्यापिण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. आपल्यापैकी अनेकांना जेवण संपताच ग्लासभर पाणी पिण्याची सवय असते. पण, ही छोटीशी सवय पचनक्रियेवर गंभीर परिणाम करू शकते. जेवणानंतर लगेच पाणी पिणं हानिकारक का मानलं जातं आणि त्यामागील कारणं काय आहेत ते समजून घेऊया.

advertisement

Joints pain : तरुणांमधे वाढतंय सांधे दुखण्याचं प्रमाण, काय आहेत कारणं ?

पचनक्रिया मंदावणं - पोटातील पाचक एंझाइम आणि गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच जठर रस पाण्यानं पातळ होतात, ज्यामुळे अन्नाचं पचन मंदावतं. यामुळे गॅस, आम्लता, पोटफुगी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.

advertisement

इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम - जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यानं शरीरात इन्सुलिनची पातळी वाढू शकते. अन्न योग्यरित्या पचत नाही तेव्हा ते ग्लुकोजमधे रूपांतरित होतं आणि चरबी म्हणून साठवलं जातं. यामुळे केवळ वजन वाढण्याचा धोका वाढतोच, पण रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.

Diet Tips : चरबी कमी करण्यासाठी टिप्स, पोटावरचा घेर होईल कमी, वाचा 1:5:1 नियम

advertisement

पौष्टिक घटकांचा अभाव - पचनादरम्यान, जीवनसत्त्वं, खनिजं आणि प्रथिनं यांसारखे पोषक घटक आतड्यांमधे शोषले जातात. पचन योग्य नसेल तर शरीर अन्नातील पोषक घटक योग्यरित्या शोषू शकत नाही. यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सेंद्रिय भाजीपाला- फळे खरेदी करताय? खरा कसा ओळखायचा? सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

जेवणाच्या तीस मिनिटं आधी आणि जेवणानंतर किमान चाळीस मिनिटांनी पाणी प्यावं. जेवताना जर तुमचा घसा कोरडा होत असेल तर कोमट पाणी किंवा ताक एक किंवा दोन घोट घेऊ शकता. पचन सुधारण्यासाठी आणि पोषक घटकांचं चांगलं शोषण करण्यासाठी अन्न पूर्ण आणि व्यवस्थित चावणं आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diet tips : जेवताना किंवा जेवल्यानंतर पाणी प्यावं की नाही ? जेवणादरम्यान पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ? जेवताना पाणी प्यायल्यानं पचनावर परिणाम होतो का ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल