पण, खरंच आयुर्वेद मांसाहार करायला मनाई करतो का? की आपण आजवर एका मोठ्या गैरसमजात जगत होतो? प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रुपाली पानसे यांनी एका पॉडकास्ट दरम्यान या विषयावर अत्यंत महत्त्वाची आणि विज्ञानावर आधारित माहिती दिली आहे, जी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो.
आयुर्वेद आणि मांसाहार: काय आहे वास्तव?
डॉ. रुपाली पानसे यांच्या मते, आयुर्वेद मांसाहार खाऊ नका असं म्हणतो, हा एक निव्वळ गैरसमज आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये मांसाहाराला 'हाय प्रोटीन डाएट' (High Protein Diet) मानले गेले आहे. विशेष म्हणजे, आयुर्वेदात मांसाहाराचे फायदे सांगण्यासाठी 'अध्यायच्या अध्याय' (Dedicated Chapters) आहेत. विविध प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्म, ते शरीरावर कसे परिणाम करतात आणि कोणत्या आजारात कोणते मांस खावे, याची सविस्तर चर्चा आयुर्वेदात आढळते.
advertisement
मांसाहाराचे आयुर्वेदानुसार फायदे:
बल वाढवण्यासाठी: शरीरातील ताकद किंवा शक्ती वाढवण्यासाठी मांसाहार हा उत्तम पर्याय मानला गेला आहे.
पोषण: शरीर सुदृढ करण्यासाठी आणि उत्तम पोषणासाठी मांसाहाराचा उल्लेख येतो.
व्याधीक्षमत्व (Immunity): शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील विशिष्ट प्रकारचे मांस फायदेशीर ठरते.
रोज नॉनव्हेज खावं का?
अनेकांना वाटतं की जर फायदा आहे, तर मग रोज खायला काय हरकत आहे? यावर डॉ. पानसे एक सुवर्णमध्य सांगतात. आयुर्वेद म्हणतो की, "रोज मांसाहार खाणं चुकीचं नाही, पण ते तितकंच गरजेचंही नाही." तुम्ही तुमच्या शरीराची गरज ओळखून त्याचा समावेश आहारात करू शकता. मात्र, हे करताना एक सर्वात महत्त्वाची अट आयुर्वेदाने घातली आहे, ती म्हणजे तुमचा 'अग्नी'.
आयुर्वेदात जठराग्नीला (पचनशक्तीला) अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. पानसे सांगतात की, तुम्ही कितीही हाय-प्रोटीन डाएट घेत असाल, पण जर तुमची पचनशक्ती (अग्नी) कमकुवत असेल, तर ते मांस तुमच्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच करेल. शारीरिक हालचाल महत्त्वाची, जर तुम्ही फिजिकल अॅक्टिव्हिटी करत नसाल आणि तरीही जड मांसाहार करत असाल, तर ते प्रोटीन शरीरात नीट पचत नाही. न पचलेले हे प्रोटीन्स शरीरात आम (Toxins) वाढवतात. हे टॉक्सिन्स पुढे जाऊन विविध आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळे मांसाहार करताना तुमची पचनशक्ती आणि तुमची जीवनशैली यांचा ताळमेळ असणे अनिवार्य आहे.
डॉ. रुपाली पानसे यांनी एका अशा रेसिपीचा उल्लेख केला आहे, जी आयुर्वेदात अत्यंत गुणकारी मानली जाते ती म्हणजे 'मीट सूप'.
हे सूप केवळ चवीसाठी नसून ते एक उत्तम औषध म्हणूनही काम करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे सूप कोणत्याही वयोगटातील व्यक्ती (लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत) आणि कोणत्याही लिंगाची व्यक्ती घेऊ शकते. हे पचायला हलके आणि पोषक घटकांनी भरपूर असते, ज्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
थोडक्यात सांगायचं तर, आयुर्वेद हा 'कट्टरतावादी' नाही तर तो 'संतुलित' आहे. तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि तुमच्या पचनशक्तीनुसार तुम्ही मांसाहार करू शकता. त्यामुळे "आयुर्वेद नॉनव्हेजला विरोध करतो" हे मान्यता आता तज्ज्ञांनी खोडून पाडली आहे.
