कशी सुचली कल्पना?
मोहन शेट्टी यांचा सुरुवातीपासूनच नारळ विक्रीचा व्यवसाय होता. नारळ विक्री करत असताना त्यांना काही वर्षांनी फुकट गेलेल्या नारळाच्या करवंटी पासून काहीतरी करावे असे वाटले. त्यानंतर त्यांनी घरातील हत्यार वापरून कलाकृती करण्यास सुरुवात केली . त्यांनी नारळाच्या करवंटीपासून स्वतः एक बाईक तयार केली. ही बाईक बनवायला त्यांना जवळपास 2 महिने लागले असे ते सांगतात.
advertisement
डोंबिवलीतील 'आदर्श' सोसायटी; कचऱ्यापासून सेंद्रीय खत करतात तयार अन् जपतात स्वत:चं आयुष्य
'मला शाळेत असल्यापासून चित्रं काढायला फार आवडत असे. मी दुकानात बसल्या बसल्याही स्केच काढत होतो. हे स्केच काढत असतानाच मला करवंटीपासून वस्तू बनवण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला एक वस्तू बनवायला 2 ते 3 महिने लागत. आता हाताला सवय झाल्यानं वस्तू पटकन तयार होतात,' असं शेट्टी यांनी सांगितलं.
नारळाची करवंटी ही खूप टणक असते. त्यामुळे तिला आकार देणे कठीण असते. आकार देत असताना किंवा तिला गुळगुळीत करताना अनेकदा हाताला लागले पण मी थांबलो नाही. दोन दिवस जखम बरी होईपर्यंत धीर धरतो त्यानंतर पुन्हा काम सुरू करतो.
पुण्यात फिरताना सुचली आयडिया, शाळकरी मित्रांनी आपल्या शहरात स्वप्न केलं साकार
मी करवंटीपासून आत्तापर्यंत जवळपास 90 वस्तू बनवल्या आहेत. यामध्ये बजाजच्या जुन्या गाड्या, वेगवेगळे पक्षी, बेडूक, जास्वंदी फुल, सायकली, अननस झाड, डाव , गणपती, ट्रेन , समई, तंबोरा, विमान , बस दुकान सांभाळत मी हे काम करतो. अनेकदा रात्री दुकान बंद झाल्यानंतरही मी नाराळाला आकार देत असतो, असं त्यांनी सांगितलं.
या वस्तूंच्या खरेदीसाठी आजवर अनेकांनी तयारी दाखवलीय. पण, मला या कलेतून पैसे नको आहेत. आपल्या हातातून एक कला घडते याचंच समाधान मिळावं इतकीच माझी इच्छा आहे, असं शेट्टी यांनी सांगितलं.





