पावसाळ्यामुळे सगळीकडे पाणी, चिखल साचलेला दिसतो. त्यामुळे डास आणि जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. या काळात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे. आजारी पडल्यानंतर किंवा अंगात ताप असल्यास आंघोळ करणं टाळलं जातं. पण, तसं न करता आंघोळ करणं गरजेचं आहे. आजारी असल्यावर स्वच्छता ठेवल्यास जंतू संसर्ग वाढण्याचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
Health Tips In Marathi: झोप पूर्ण नसल्यास चिडचिड अन् थकवा, मग झोपेचे योग्य गुपित काय? Video
पाणी उकळून प्या
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. पाणी फिल्टरचं असलं तरीही त्याचं पूर्णपणे निर्जंतुकीकरण झालेलं नसतं. कधीकाधी त्या पाण्यातूनही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पाणी कुठलंही असलं तरी आपली पारंपारिक पाणी उकळून पिण्याची पद्धत फायद्याची आहे. पावसाळ्यात पाण्यातून होणारा संसर्ग त्यामुळे रोखला जातो, असं डॉक्टर सांगतात.
कसा असावा आहार?
पावसाळ्यात बाहेरचा आहार हा टाळला पाहिजे. त्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. पावसाळ्यात सकस आहार घ्यावा आणि भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे. आहारात प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. भाजीपाला, फळांचे प्रमाण अधिक असावं. बाहेरचा आहार घेतल्यास आजाराचा धोका असतो. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार झाल्यास आजार वाढत नाही, असंही डॉक्टर धनेश्वर सांगतात.