थंडी वाढली की, शरीराला नैसर्गिक उष्णतेची गरज भासते. तीळ हे एक नैसर्गिक उष्णतावर्धक आहे. तिळात उच्च प्रमाणात नैसर्गिक चरबी असते, ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि थंडीचा त्रास कमी होतो. रोज सकाळी थोडे तीळ खाल्ल्यास शरीराची चयापचय क्रिया सुधारते. यामुळे आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा सातत्याने मिळत राहते. थकवा जाणवत नाही. थंडीत रक्ताभिसरण मंदावते, ते सुधारण्यासाठी तीळ अत्यंत महत्त्वाचे ठरते.
advertisement
मराठा पाटवडी आणि झणझणीत रस्सा; विदर्भातील ही फेमस Dish खाऊन बोटं चाटत राहाल!
हिवाळ्यामध्ये अनेक वयस्कर लोकांना सांधेदुखी आणि हाडांच्या दुखण्याचा त्रास वाढतो. अशा वेळी तीळ हे कॅल्शियमचे नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करते. तीळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे सर्व घटक हाडे मजबूत करण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतात. तिळाच्या तेलाने सांध्यांची मालिश केल्यास थंडीमुळे आलेला सांध्यांचा कडकपणा कमी होतो.
थंडीत सर्दी, खोकला, ताप हे आजार सहजपणे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीळ अत्यंत गुणकारी आहे. तिळात झिंक आणि सेलेनियम सारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात, जी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. हिवाळ्यात कोरडी पडणारी त्वचा ही एक मोठी समस्या असते. तिळात असलेले व्हिटॅमिन-ई आणि नैसर्गिक तेल त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.
तीळ हे केवळ गोड पदार्थ बनवण्यासाठी नाही, तर संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तीळ उष्ण असल्याने, ते नेहमी मर्यादित प्रमाणात खावे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात उष्णता वाढू शकते. म्हणून, या हिवाळ्यात तिळाचे लाडू, चिक्की किंवा तिळाची चटणी आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा आणि आपले आरोग्य जपा.





