TRENDING:

असाध्य रोगातून मिळेल मुक्ती, आजच सुरू करा अनुलोम विलोम, हे फायदे माहितीयेत का?

Last Updated:

आपल्या सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी प्राणायामाचे खूप महत्त्व आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 17 डिसेंबर: आपल्या सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी प्राणायामाचे खूप महत्त्व आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा प्राणायाम म्हणजे अनुलोम-विलोम होय. गंभीर आजारांवरही अनुलोम-विलोम हा प्राणायाम उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे हा प्राणायाम करण्याची योग्य पद्धत कोणती? तसेच या प्राणायामाचे मानवी शरीरासाठी किती फायदे आहेत? कोणकोणत्या आजारांवर हा प्राणायाम हितकारक ठरू शकतो? यासंदर्भात वर्धा येथील ज्येष्ठ योग मार्गदर्शक दामोदर राऊत यांनी माहिती दिली आहे.
advertisement

असा करा अनुलोम विलोम

अष्टांग योगातील चौथं आणि महत्त्वपूर्ण अंग म्हणजे प्राणायाम होय. प्रणायममध्ये पाचव्या क्रमांकाचे प्राणायाम अनुलोम विलोम आहे. हे करत असताना उजवा अंगठा उजव्या नासिकेवर ठेवून नासिका बंद करायची आणि डाव्या नासिकेने लांब श्वास घेऊन उजव्या नासिकेने सोडायचा आहे. परत उजव्या नासिकेने श्वास घेऊन डाव्या नासिकेने सोडायचा आहे. डावी नासिका ही चंद्र स्वर आहे म्हणजे शीतलतेचं प्रतीक आहे. तर उजवी नासिका ही सूर्य स्वर आहे. म्हणजे उष्णतेचे प्रतीक आहे, असं राऊत सांगतात.

advertisement

हिवाळ्यात घरीच करा ‘ही’ योगासने; मन आणि शरीर राहील तंदुरुस्त Video

किती वेळ करावा अनुलोम विलोम?

नवीन साधकांनी जवळजवळ पाच ते पंधरा मिनिटं अनुलोम विलोम करावं. तसेच हळूहळू वाढवून अर्धा तासापर्यंत करू शकता. या प्राणायामाचे अन्नसाधारण महत्त्व आहे. हा प्राणायाम आपण कधीही शांत बसून असताना करू शकतो. विशेष म्हणजे हे प्राणायाम करत असताना एक काळजी घ्यायची आहे की डाव्या नासिकेतूनच लांब श्वास भरायचा आहे. शितलतेकडून उष्णतेकडे जायचं असतं, अशी माहिती दामोदर राऊत यांनी दिली.

advertisement

हार्टअटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतो रोजच्या आहारातील 'हा' घटक, किती असावं प्रमाण?

काय आहेत फायदे?

हिवाळ्यामध्ये या प्राणायामाचे फार मोठे फायदे आहेत. या प्राणायमामुळे सर्दी, खोकला, एलर्जी, दमा, सायनस, लकवा अशासारखे असाध्य रोग दूर होतात. सोबतच मायग्रेन, मानसिक आजार यांपासून सुटका मिळवता येऊ शकते. कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगासंबंधी जेवढे काही आजार आहेत हृदयाचे ब्लॉकेज देखील या प्राणायामामुळे नष्ट होतात. एवढं महत्त्वपूर्ण हे प्राणायाम आहे.

advertisement

या प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण नसनाड्या ह्या परिशुध्द होत असतात. म्हणजे हा जो ऑक्सिजन आहे तो नासिकेच्या प्रवेशद्वारातून आपल्या शरीरात प्रवेश करत असतो. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतो. त्यामुळे आपल्याला जे काही असाध्य रोग आहेत ते नष्ट होतात आणि येणारे रोग हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. इतकी ताकद या प्राणायामाची आहे. मधुमेह, आमवात, गाठी, सोरायसस या सर्व व्याधी दूर होतात, असंही योग मार्गदर्शक राऊत सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
असाध्य रोगातून मिळेल मुक्ती, आजच सुरू करा अनुलोम विलोम, हे फायदे माहितीयेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल